जालना मराठा बांधवांवर केलेल्या भ्याड घटनेचा निषेध दौंड येथील लिंगाळी ग्रामपंचायतीच्या वतीने रस्ता रोको करून आंदोलन.
गृहमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा समस्थ मराठा समाजाची मागणी.
प्रतिनिधी – विकी ओहोळ
दौंड -1 सप्टेंबर रोजी जालना येथील अंतरवली सराठी या गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जरांदे पाटील यांच्या सह काही ग्रामस्थ यांनी उपोषण केले होते 4 दिवस उपोषण शांतता पूर्वक चालू होते तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटावा व अनेक कालावधीपासून प्रलंबित असणाऱ्या मागण्या पूर्ण व्हाव्यात ,काहींची तब्येत खालावली होती म्हणून अनेकांनी उपोषण मागे घ्यावे अशी विनंती केली होती पण उपोषण करते आपल्या मागणीवर ठाम होते आंदोलनामध्ये 5000 पेक्षा जास्त नागरिकांनी सहभाग घेतला होता.
सर्व काही सुरळीत सुरु असताना पोलिसांनी कोणाच्या आदेशाने आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला व आंदोलकांवर लाठचार्ज केला असा सवाल करण्यात आला .
जरांडे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांच्या आंदोलनाला समस्त लिंगाळी ग्रामस्थ, गोपाळवाडी व सकल मराठा समाज पाठिंबा देत आहे असे निवेदन देण्यात आले.
यावेळीदौंड पोलीस स्टेशन दौंड व दौंड तहसीलदार दौंड यांना बोरावके नगर लिंगाळी चौक येथे लोकशाही पध्दतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी विक्रम पवार,अमित सोनवणे ,वीरधवल जगदाळे, सुनील जगदाळे,नंदू जगताप, निता वाघमारे, करण आढाव, गणेश जगदाळे,राहुल मुळे तसेच संभाजी ब्रिगेड, शाही आलमगीर मस्जिद पब्लिक ट्रस्ट, पीपल्स रिपब्लिकन पक्ष, दौड बार असोसिएशन यांचा पाठिंबा मिळाला
तसेच अनेक दलीत, मुस्लिम बांधव यांनीही आपला पाठिंबा दर्शविला व झालेल्या भ्याड हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा.अशी मागणी समस्थ लिंगाळी ग्रामस्थ, गोपळवाडी व सकल मराठा समाजाकडून करण्यात आली.