अमळनेर : ‘प्रताप’ कॉलेजच्या करिअर कौंसेलिंग सेंटरच्या वतिने आयोजित स्पर्धा परीक्षा कार्यशाळेत यावेळी तें बोलत होते..
अमळनेर: विक्की जाधव..

अमळनेर : ‘प्रताप’ कॉलेजच्या करिअर कौंसेलिंग सेंटरच्या वतिने आयोजित स्पर्धा परीक्षा कार्यशाळेत दुसरे पुष्प प्रा.वाल्मिक बिलसोरे (द युनिक अकॅडमी,पुणे)यांनी गुंफले.या वेळी ते बोलताना म्हणाले की,स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करण्यासाठी गणित हा विषय अंत्यत महत्वाचा आहे,भाषेचे व्याकरण जसे महत्वाचे आहे तसे गणित व बुद्धिमत्ता फार महत्वाचे आहे.गणित आत्मसात केल्याशिवाय आपणास पुढे जाता येत नाही.गणित विषयासाठी रोज तीन तास अभ्यासात सातत्य ठेवा.मूलभूत संकल्पना वा सूत्र समजून घेणे महत्वाचे आहे.त्यांनी आपल्या एक तासाच्या व्याख्यानात विद्यार्थ्यांना गणित, बुद्धिमत्ता,भूमिती मधिल विविध सूत्र,संदर्भ समजून सांगितले.
प्रस्तुत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविदयालायचे उप प्राचार्य डॉ कल्पना पाटील हे होते,त्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले की,खूप अभ्यास करा आणि जीवनाचे गणित पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा.या वेळी वक्त्यांचा परिचय डॉ माधव भूसनर यांनी करून दिले.सूत्र संचालन गणित विषयाचे विभाग प्रमुख डॉ.नलिनी पाटील यांनी केले तर आभार डॉ.धनंजय चौधरी यांनी मानले.या वेळी डॉ.राखी घरटे,प्रा.सोनूसिंग पाटील यांच्या सह असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.