राजकारणाचा कुंटणखाना करून टाकला या भ्रष्ट राजकारण्यांनी !
( दिलीप मालवणकर यांचा झणणीत लेख )
राजकारण आत्ता निर्लज्ज निगरगट्ट व भ्रष्टाचारी लोकांचा अड्डा झाला आहे. पक्ष निष्ठा, तत्वं, आदर्श व नीतिमत्ता यांचा पालापाचोळा झाला आहे.मतलबी व चमडी बचाऊ आमदार, खासदार रातोरात आपल्या निष्ठा व आदर्श पायदळीतुडवून नवीन घरोबा करीत आहे. बरं घरोबापण कोणाशी तर ज्यांना कालपरवा आपण बदफैली, बदमाश व हजारो करोडोंचे भ्रष्टाचार करणारे म्हणून दुषणं देत होतो त्यांच्याशी.कमळाबाई~~ कमळाबाई म्हणून हिणवणारे अजित पवार कमळाबाईच्या कुशीत विसावतात. तर राष्ट्रवादीवर ७०हजार कोटीचा उघड आरोप करणारे मोदीजी राष्ट्रवादीला अलिंगन देऊन मंत्री पदं बहाल करतात. नारायण राणे व त्याचे टिल्लू पिल्लू तर इतकी गरळ ओकतात की त्यांच्या इतका मोदी- शहा निष्ठ व भाजपा समर्पित अन्य कोणीच नाही. बाटगा आपली निष्ठा जाहिर करण्यासाठी सर्वांचे लक्ष वेधण्यासाठी मोठमोठ्याने बांग देतो, तशी बांग राणे, शिंदे व त्यांचे लांडगे देत असतात. तो टिनपाट संजय शिरसाट दिघे साहेबांच्या अपघाती मृत्यूला घातपाताचा रंग देतो, म्हस्केला तर वाटतं माझ्या हाती स्वर्ग लागला. पगार किती बोलतो किती ? दिघेसाहेबांनी कानफडलेले लांडगे कोल्हे निष्ठेच्या गप्पा मारत आहेत.
एकतारीवर एकनाथ निष्ठेची धून वाजवित आहेत.
ज्या एकनाथ शिंदेंनी इडीतून सुटका करून घेण्यासाठी भाजपाच्या आश्रयाला गेले, त्याच भाजपाची साथ सोडा म्हणत राजीनामा देण्याचे नाटक केले होते, त्यांना आता मोदी शहा व फसवणिसांची सकाळ- संध्याकाळ आरती ओवाळावी लागत आहे.भाजप हा अतिमहत्वाकांक्षी व सत्तापिपासू पक्ष आहे. स्वत:चा पक्ष वाढविण्यापेक्षा इतर पक्ष फोडणे त्यासाठी लाखो खोके वाटणे यातच त्यांना स्वारस्य वाटते. गेल्या ९ वर्षात भाजपने ९ सरकारं पाडली. महाराष्ट्रात शिवसेना संपवण्यासाठी मिंधेंच्या मदतीने ४० आमदार व १२ खासदार फोडूनही या पक्षाची बकासूरी भूक भागली नाही. त्यांनी अजित पवारांना मुख्यमंत्री पदाचे गाजर दाखवून राष्ट्रवादीचे आमदार फोडले.फसवणीसांचं हे वागणं “नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी ( विधवा ) झाली पाहिजे” या म्हणीला साजेसेच आहे. १०५ + आमदार गाठीशी असताना ४० फुटीर गद्दारांना मुख्यमंत्रीपद व १८ गद्दारांना मंत्री पदाची बक्षिसी देत असताना राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या फुटीर व पक्षद्रोही आमदारांना ९ मंत्रिपदं बहाल केली. स्वत:ला उपमुख्यमंत्री हे असंवैधानिक पद घेतले व १०५ पैकी फक्त १८ आमदारांना मंत्रीपद देता आले. दरवेळी विधान भवनात व बाहेरही दुय्यम स्थान असल्याचे भासवावे लागते. स्वत: मुख्यमंत्र्यासह १६ गद्दार आमदारांची अपात्रता लांबवण्यासाठी कुलृप्त्या योजाव्या लागत आहेत. कुठे ३ मतांसाठी लाचारी व तोडफोडीचे राजकारण न करता दिमाखात पंतप्रधान पदावरून पायउतार होणारे अटलजी व कुठे हे गद्दारांची टोळी जमवून सत्ता सुंदरीला कवटाळणारे व्यभिचारी भाजपावाले ?
एकनाथ शिंदे हे लाखो शिवसैनिकांचे शिव्याशाप खात मुख्यमंत्री पदाला बिलगून राहिले आहेत.सर्वसामान्य जनताही शिंदेंच्या या घातकी प्रकाराने हळहळत आहे.त्यांचे आमदार खासदार हे भोक पडलेल्या जहाजात बसलेले असूनही शिवसेनेवर गरळ ओकत आहेत. मुख्यमंत्री पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी काल संसदेत बालिशपणे शिवसेनेवर आरोप करताच शिवसेनेचे वाघ खासदार अरविंद सावंत गरजले- त्यावेळी तुझा जन्मही झाला नव्हता,
तुम्ही बाळासाहेबांचे पाईक नसून भगोडे आहात ! निवडणूकीत मतदारराजा आपल्या गद्दारीचा व खोक्यांचा, सुरत, गुवाहत्ती, गोवा प्रदक्षिणेचा व मिंधेगिरीचा चोख हिशेब करणार आहे, हे ठाऊक असल्याने निवडणूक घेण्यास टाळाटाळ केली जात आहे.
ये तो हिटलरके साथी है
इनसे संभलके रहना रे भाई
असे महाराष्ट्र गर्जून सांगत आहे. सर्वोच्च न्यायालयाने जाहिरपणे सांगितले आहे, सत्ताधा-यांना जाब विचारणारेच खरे पत्रकार असतात. माझ्याही मते गुडी गुडीबाज हे खुशमस्करे असतात. मी सत्ताधा-यां विरोधात लिहिण्याची हिंमत ठेवतो. त्याबदल्यात मला एका टपोरी बेवड्याने धमकी देण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी माझा हिसका दाखवताच तो भूमीगत झाला तो कायमचा.रमेश चव्हाण या उंदराने कलुशा कब्ज्या व आगलाव्या शकुनी मामाच्या नादी लागून माझ्या विरोधात एफआयआर दाखल केला होता, तेव्हा मी रमेश चव्हाणला दातखिळी बसेल असा दणका दिला व पुढेही देतच राहणार. एक कुत्री मध्यरात्री माझ्यावर भुंकली होती, त्यात तिचा एक कुत्रा पण भुंकला. भुंकणारे कुत्रे कुत्री चावू शकत नाहीत, पण त्यांची नसबंदी करायची कला मला चांगलीच अवगत आहे.
आजच्या राजकारणाला राजकारण म्हणणे हा फारस रोडचाही अपमान आहे. ज्या राजकारण्यांनी आपल्या वैयक्तिक स्वार्थापायी, लफडी कुलंगडी व अवैध संपत्ती वाचविण्यासा़ठी राजकारणाचा जो कुंटणखाना केला आहे, त्या ना लायक लोकांना जनताच नव्हे तर नियती व परमेश्वरही माफ करणार नाही.
दिलीप मालवणकर
९८२२९०२४७०