विश्व प्रसिद्ध लेखक लुई फिशर यांनी बाबासाहेबांची भेट घेतली तो प्रसंग…
डावीकडून “पांडुरंग नाथूजी राजभोज”
लेखक लुई फिशर व बाबासाहेब आंबेडकर
आज दिनांक २२ जूलै…
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी
पांडुरंग नाथूजी राजभोज यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
(१५ मार्च १९०५ — २२ जूलै १९८४)
नाशिक जिल्ह्यात १५ मार्च १९०५ रोजी “पांडुरंग नाथूजी राजभोज” यांचा जन्म झाला .
पश्चिम खानदेशातील धुळे येथे शिक्षण. सरकारी नोकरीतील ‘जातियतेला कंटाळून १९२५ साली राजीनामा देऊन बाबासाहेब स्थापित बहिष्कृत हितकारणी सभेचे कार्य पुण्यात सुरू केले.”
१९२७ मार्च मध्ये बाबासाहेबांनी केलेल्या “चवदार तळे सत्याग्रहात” त्यांनी सक्रिय भाग घेतला.
“२५ डिसेंबर १९२७ महाड येथे भरलेल्या सत्याग्रह परिषदेत मनुस्मृती दहन करण्याच्या बापू साहेब सहस्रबुद्धे यांनी मांडलेल्या ठरावाला राजभोजांनीच पाठिंबा दिला. ”
‘१९२८ मध्ये पुण्यात पर्वती मंदिर प्रवेश सत्याग्रहात राजभोज यांनी पुढाकार घेतला. सनातन्यांकडून बेदम मारहाण झाली.”
“१९३० ते ३३ या काळात ते गांधीजींच्या सहवासात आले.”
“डॉ. आंबेडकरांच्या अस्पृश्यांच्या स्वतंत्र मतदार संघाच्या मागणीस यांनी विरोध केला.”
पुणे करारावर सही करणाऱ्या नेत्यापैकी एक नेते.
“सावरकर व पंडित मालवीय यांच्या विचारांनी प्रभावित होऊन हिंदू महासभेच्या कार्यकारिणीचे ते एक वर्ष सभासद होते.”
“१९३५ साली येवले परिषदेत बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली तेव्हा त्यांनी अस्पृश्यांच्या धर्मांतराला विरोध केला.”
“डॉ. आंबेडकरांच्या धर्मांतराला विरोध करणारा हा पहिला अस्पृश्य नेता होय.”
१९३७ साली ज्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या त्यावेळी
“डॉ.आंबेडकरांचे मते फोडण्यासाठी काँग्रेसने राजभोज व देवरुखकर यांना उभे केले परंतु त्यांचा पार धुव्वा उडून डॉ. आंबेडकर प्रचंड मतांनी विजयी झाले.”
नंतर राजभोज
डॉ. आंबेडकरांच्या पक्षात सामील झाले. व “नोव्हेंबर १९३६ मध्ये वर्धा जिल्ह्याचा दौरा करून अस्पृश्यांनी काँग्रेसच्या नादी न लागता दलिताचे एकमेव नेते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली संघटित व्हावे असा त्यांनी प्रचार केला.”
“डॉ. आंबेडकरांच्या धर्मांतराला एकेकाळी तीव्र विरोध करणाऱ्या राजभोजांनी १९५७ साली ”
डॉ. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर थायलंड मधील बँकॉक येथे विधीपूर्वक बौद्ध धर्माचा स्वीकार केला.”
दलित व बौद्धांच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी
“अनेक वेळा पांडुरंग नथ्थूजी राजभोज यांनी उपोषणे केली व सरकारला वेळोवेळी निवेदन दिली. ”
“१ जून १९८२ मध्ये कोलंबो येथील जागतिक बौद्ध परिषदेत त्यांनी भाग घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन व कार्य यावर भाषण केले. जीवनाच्या अखेरपर्यंत सार्वजनिक कार्य केले” .
“राजभोज यांनी काँग्रेस पक्ष व आंबेडकर पक्ष अशी पक्षाची धरसोड का केली हे त्यांच्या शब्दात पाहणे अधिक उदबोधक होईल.’
१२ मे ४० रोजी भानखेडा (नागपूर) येथील जाहीर सभेतील भाषणात राजभोज म्हणाले…
“पुणे करारानंतर म. गांधींनी ‘हरिजन सेवक संघ’ काढला व मला वाटले म. गांधी अस्पृश्यांची खरी सेवा करतील त्यामुळे मी कॉंग्रेसमध्ये शिरलो… ” “आश्रमापासून दोन मैलावर अस्पृश्यांची वस्ती होती… तेथे अस्पृश्यांची स्थिती इतकी भयंकर वाटू लागली की, मला रडू आले.” “कुत्र्यामांजरांपेक्षाही अस्पृश्यांना नीच मानीत असल्यामुळे हा प्रकार महात्माजींच्या कानी घातला, परंतु काही उपयोग झाला नाही”……
हरिजन सेवा संघ चालविण्याचे कारण मला हळूहळू कळू लागले. “अस्पृश्यांतच आपापसात फूट कशी पडेल, ह्याकडे संघाचे लक्ष जास्त असते. म्हणून या हरिजन सेवक संघापासून व काँग्रेसपासून अस्पृश्यांनी दूर राहावे.”
” डॉ. बाबासाहेबांनी धर्मान्तराची घोषणा केली त्याच्याविरुद्ध मी होतो… पण मला धर्मान्तराचे खरे कारण पटले व बाबासाहेबांचा मी अनुयायी झालो”
. “आजपर्यंत आपण बाबासाहेबांच्या धोरणास विरोध करून जी पापे केली आहेत त्याबद्दल समाजापुढे येऊन जाहिर माफी मागावी व डॉ. बाबासाहेबांचे अनुयायी होऊन त्यांच्या स्वतंत्र मजूर पक्षाची संघटना वाढवावी, अशी मला उपरती झाली.”
त्यांचे पुणे येथे “२२ जुलै १९८४ रोजी निधन झाले.”
“अशा या बाबासाहेबांचे सहकारी”
“पांडुरंग नाथूजी राजभोज ”
“यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.”
🌷🙏👏
“समकालीन सहका-यांच्या आठवणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर “. पृ.८६,८७,८८.
संपादन – संकलन… विजय सुरवाडे.