सध्या दररोज हजारो गाड्या ह्या विना पास परमीट बकऱ्यांची व शेळ्यांची वाहतुक ही मुंबई आग्रा महामार्गाने होत असते. त्यात आपले अधिकारी तसेच हायवे ट्रॅप खात्यातील अधिकारी हे सर्रासपणे सहा चाकी गाडीचे १०००/- व दहा चाकी गाडीचे १५००/- रूपयाप्रमाणे एंट्री घेवून वाहतुक करण्यास परवानगी देत आहे. सदरचे बकरे तसेच शेळ्या कत्तलीसाठी नेत असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होवून गाड्या पास केल्या जात आहेत.
तरी महाशय ट्रान्सपोर्ट रेलन अॅक्ट मोटार वाहन कायदा तसेच महाराष्ट्र अॅनीमल प्रिव्हेंशन अॅक्टप्रमाणे कारवाई होवून आम्हास ताबडतोब न्याय मिळावा. बेकायदेशीरपणे होत असलेली गाड्यांतील बकऱ्यांची व गुरांची वाहतुक बंद करणेत यावी व त्यांचेवर कायदेशीर कारवाई करावी .