मदनवाडी उड्डाणपुलाखाली साचला कचऱ्यांचा ढिगारा; महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष
(निलेश गायकवाड )
भिगवण परिसरातील सर्वाधिक वाहतुकीचे ठिकाण व वर्दळीचे ठिकाण असणारे मदनवाडी उड्डाणपुलाखाली साचला कचऱ्याचा ढीग. वाढत्या कचऱ्यामुळे दुर्गंधीचे ही प्रमाण वाढले आहे. यामुळे रोगराई साठी निमंत्रण देण्यात आल्याचे दिसत आहे. याकडे मात्र महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष होतानाचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे .
प्रशासनाने कचऱ्याच्या विल्हेवाटासाठी नियमित सातत्य कमी असल्याचे दिसत आहे. वारंवार नागरिकांना, प्रवासी यांना कचऱ्यापासून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वर्दळीच्या ठिकाणी कचऱ्याच्या विल्हेवाटासाठी नियमितता असणे गरजेचे आहे. हजारो-लाखो रुपयांची बिल काढून देखील नागरिकांना कचऱ्याच्या गंभीर समस्येपासून होणारा त्रास ही नेत्याचीच बाब दिसून येत आहे.
तसेच स्थानिक पातळीवर देखील नागरिकांनी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य नियोजन करावे. मदनवाडी चौकातील स्वच्छता नियमित राहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी जागरूकता देखील दाखवली पाहिजे. तसेच प्रशासनाला देखील स्वच्छतेच्या बाबतीत सूचना दिल्या पाहिजे.