कर्जत शहरातील मुख्य रस्त्याचा दशावत थांबवा नाहीतर २मे पासुन बेमुदत ठिय्या आंदोलन पत्रकार आशिस बोरांनी दिला इशारा
दोन दोन आमदार तरीही कर्जत शहरात समस्यांचा महापुरच
प्रतिनिधी.संदिप कायगुडे
कर्जत.कर्जत शहरातील मुख्य रस्ताचे दुर्दैवाचे दशावतार गेली अनेक दिवस संपायला तयार नाहीत यामुळे कर्जत शहरातील लकी हॉटेल ते जोगेश्वर वाडी दरम्यानच्या या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या कर्जत तालुक्यातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असताना शहरातील नागरिकांना तर खराब रस्त्यासह, त्यावरील धूळ, सतत सुरू असलेल्या दीर्घ कालीन रस्त्याच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी, रस्त्यावरून वाहणाऱ्या व रस्त्यावर साठनाऱ्या गटारीच्या दुर्गंधी युक्त पाण्यामुळे जीवन नकोसे झाले आहे याकडे प्रशासनाचे जबाबदार विभाग लक्ष द्यायला तयार नाहीत. याशिवाय लोकप्रतिनिधी विविध पक्षाचे राजकीय नेते लक्ष द्यायला तयार नाहीत मात्र या रस्त्यावरील विविध अडचणी मुळे माझे स्वतःचे माझ्या कुटुंबाचे, माझ्या मित्र मंडळीचे व कर्जत मधील नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील विविध अडचणी बाबत संबंधित जबाबदार शासकीय यंत्रणा ना आपल्या पातळीवर जाब विचारावा व या कामाबाबत जबाबदाऱ्या निश्चित करून दप्तर दिरंगाई, कामात कसूर करणे, कर्तव्य व जबाबदारी पार न पाडणे या अनुषंगाने कायदेशीर कारवाई करावी. या रस्त्यावरील अडचणी संदर्भात आपण तालुका दंडाधिकारी या नात्याने विविध जबाबदार प्रशासकीय यंत्रणेची यामध्ये
सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपंचायत, आरोग्य विभाग, पोलीस आदी विभागाची जबाबदारी निश्चित करून काल मर्यादा ठरवून देत यावर कारवाई करावी ही विनंती आशिष बोरा यांनी केली.
यामध्ये त्यांनी प्रमुख मागण्या
१) लकी हॉटेल ते जोगेश्वरवाडी दरम्यानचे रस्ता निर्माणाचे काम तातडीने पूर्ण करन्यात यावे,
२) वरील रस्त्यावरील अनेक ठिकाणी अपूर्ण असलेले काम पूर्ण व्हावे.
३) रस्त्यावरील धूळ काढून टाकण्यात यावी. धुळमुक्त रस्ता करण्यात यावा.
४) रस्त्यावर येणारे गटारीचे पाणी बंद करण्यात यावे.
५) रस्त्यावर वाहतुकीस अडथळा करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात यावी.
६) वेळेत काम न करणाऱ्या, प्रशासनातील विलंब करणाऱ्या, समस्या कडे दुर्लक्ष करणाऱ्या शासकीय विभागाची जबाबदारी निश्चित करण्यात यावी व कामात कसूर होत असेल तर कारवाई करावी.
याबाबत आगामी आठ दिवसात आपण सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपंचायत, आरोग्य विभाग, पोलीस आदीसह जबाबदार सर्व विभागाची बैठक घेऊन नागरिकांच्या सुखकर आयुष्यासाठी या रस्त्यावरील अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत ही विनंती. आगामी आठ दिवसात मार्ग न निघाल्यास दि २ मे रोजी पासून आपल्या कार्यालयासमोर मी स्वत: ठिय्या आंदोलन करणार असून यामध्ये माझ्या बरोबर शहरातील अनेक नागरिक ही सहभागी होऊ शकतात. याची दक्षता घ्यावी, यावेळी होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार असेल आसा इशाराही आशिष बोरा यांनी दिला.