महाराष्ट्र राज्य विधिमंडळ हक्क भंग समितीच्या अध्यक्षपदी आमदार कुल
प्रतिनिध,खानोटा(स्वप्निल पवार)
शिंदे-फडणवीस सरकारकडून नवीन हक्कभंग समिती स्थापन करण्यात आली याच्या प्रमुख पदी दौंड तालुका आमदार राहुल कुल यांची निवड करण्यात आली,
आमदार संजय राऊत यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी 15 जणांची हक्क भंग समिती जाहीर करण्यात आली आहे.खासदार संजय राऊत त यांनी केलेल्या वक्तव्याविरुद्ध शिंदे सरकार आक्रमक झाली असून “हे विधिमंडळ नाही तर चोरमंडळ आहे” असं विधान संजय राऊत यांनी केलेले या विधानाचे आज विधिमंडळात चांगलेच पडतात दिसून आले. त्यानुसार आज हक्कभंग समिती सर्व पक्षाच्या विधिमंडळ सदस्य मधून करण्यात आली.याच्या अध्यक्षपदी आ.राहुल कुल यांची निवड करण्यात आली.
या समिती त एकूण पंधरा सदस्य असणार आहेत यामध्ये अतुल भातखळकर ,योगेश सागर, अमित साटम,नितेश राणे, संजय शिरसाठ यांची सदस्य पदी निवड करण्यात आली आहे