भोई समाजासाठी घरकुल योजना राबवण्यात यावी; उज्वला परदेशी
प्रतिनिधी : अजिनाथ कनिचे
उजनी तसेच राज्यात मोठ्या प्रमाणात भोई जातीचे बांधव आहेत. भोई समाजाचा उल्लेख व इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सर्वज्ञात आहे. अर्थात मासेमारी करून उदरनिर्वाह करणे हा पारंपरिक व्यवसाय आहे.
तसेच ज्याप्रमाणे आदिवासी समाज गणला जातो, तशीच काहीशी स्थिती भोई समाजाची आहे. धरण, नदी, तलावांच्या कडेला शक्यतो वास्तव्य असते त्यामुळे बहुतांश भोई लोकांना स्वतःची राहण्यासाठी जागा उपलब्ध नाही. मोकळ्या जागेत धरतीचे अंथरूण आणि आकाशाचे पांघरूण करणे. अर्थात झोपडी, कोपी, पाल तयार करून आजही भोई समाज राहत आहे. हे जळजळीत वास्तव आहे. मासेमारी करून उदरनिर्वाह भागवण्याचे जिथं जगणं जिकरीचे आहे. तिथे जागा घेऊन घर बांधणे भोई समाजासाठी केवळ स्वप्नातील गोष्ट आहे.
भोई समाज हा अतिशय मागासलेला व तेवढाच गरीब आणि आर्थिक दुर्बल आहे. मासेमारीसाठी सतत भटकंती करावी लागत असल्याने हा समाज उपेशित राहिलेला आहे. या समाजाचा आवाज सतत दबला गेला आहे.जागा, घरे, दारे नसल्याने मुलेही शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. आणि यातूनच आजही भोई समाज उपेशीत जीवन जगत आहे.
यामुळे सरकारने राज्यातील भोई समाजाला धरण, नदी व तलावाच्या कडेला दोन गुंठे जागा व घरकुल योजना राबवावी, अशी मागणी कुंभारगावच्या सरपंच उज्वला परदेशी यांनी आ. दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली. समाजाचा सर्व्हे करून आरक्षण, जागा व घरे बांधून द्यावीत. अशी मागणी उजनितील मच्छिमार
नेते चंद्रकांत भोई व राहुल नगरे यांनी केली आहे.

