शेतकऱ्यांच्या मुलाने शाश्वत शेतीबरोबर शेतीपूरक व्यवसाय केला पाहिजे.
कृषी अधिकाऱ्यांसह कृषिकन्यांनी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन
प्रतिनिधी संदीप कायगुडे
कर्जत : बर्गेवाडी ता. कर्जत येथे ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत आलेल्या कृषी कन्यांचे ग्रामस्थांनी स्वागत केले .या कृषी कन्या येथील शेतकऱ्यांना शेती व्यवसायामध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरण्याची माहिती देणार आहेत .
या कार्यक्रमासाठी उपविभागीय कृषी अधिकारी श्री अनिल गवळी सर तसेच तालुका कृषी अधिकारी श्री म्हस्के सर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला .
तालुका कृषी अधिकारी श्री मस्के यांनी शेतकऱ्यांना विविध सरकारी योजना समजावून सांगितल्या त्यामध्ये अवजार बँक ,ठिबक सिंचन ,कांदा चाळ ,अस्तरीकरण ,मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना इ.बद्दल योग्य मार्गदर्शन केले .
पद्मभूषण शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय बारामती येथिल विद्यार्थिनी मोहिनी ठुबे ,आदिती जाधव ,अंजली दहातोंडे ,भारती मिसाळ, रवालिका कल्याणपु,श्रीजा रेड्डी इत्यादी कृषी कन्यांचे गावकऱ्यांनी स्वागत केले. शेतकऱ्यांनी आधुनिक शेती शेती करत विविध आधुनिक शाश्वत शेतीच्या योजना शेतीमध्ये राबवल्या पाहिजे. शाश्वत शेती बरोबर समाज हिताची कामे सुद्धा शेतकऱ्यांनी केली पाहिजे. शेतीला पूरक पशुपालन इतर शेती विषयी उद्योगधंदे, जोडधंदे शेतकऱ्यांची मुलांनी केली पाहिजे. जेणेकरून शेतकऱ्याचा परिपूर्ण विकास होईल. याविषयी या कृषीकन्यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
यावेळी बर्गेवाडी गावाचा कृषी नकाशा या कृषीकन्यांनी आपल्या रांगोळी कलेतुनच रेखाटला. या हस्तकलेचे गावकऱ्यांनी कौतुक करत समाधान व्यक्त केले.यावेळी गावातील बापूसाहेब नेटके, कुषाभाऊ नेटके, रामदास परहर, विजय नेटके ,धीरज पडोळे, दादासाहेब पठाडे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.