June 30, 2025 11:31 am

80 वयाचा म्हातारा तिरडीवर
जाण्याच्या वयात झाला गद्दार

अपनी भाषा में पढ़े! Translate

80 वयाचा म्हातारा तिरडीवर
जाण्याच्या वयात झाला गद्दार

(दिलीप मालवणकर यांचा जळजळीत लेख )
सरणावर जायची वेळ आली असताना गेल्या 50 वर्षाहून‌ अधिक काळ ज्या शिवसेनेने भरभरून व भरपेट दिले,असे गजाभाऊ किर्तीकर वयाच्या 80 व्या वर्षी शिंदे फुटीर गटात विलीन झाले.खरं तर हे वय पंचत्वात विलीन व्हायचं किंवा इश्वर भक्तीत लीन व्हायचं. विकलांग अवस्थेत या वयात मिंधेपणा करायची गरजच काय ? शिवसेनेने स्थानिक लोकाधिकार समितीचे नेतृत्व बहाल केलं,आमदारकी,खासदारकी दिली,बॅन्केतील एका कारकूनाला राजेशाही वैभव,थाटमाट व प्रतिष्ठा मिळवून‌ दिली,त्याने असा हरामखोरपणा करणे हे अशोभनीय आहे.
मिंधे गट तुम्हाला देऊन देऊन काय देणार ? तुमच्या पेक्षा कनिष्ठ व मुलाच्या वयाच्या शिंदेला तुम्ही साहेब,साहेब म्हणणार,त्याचे आदेश शिरसावंद्य मानणार ? जी हुजूरी करणार ? त्या बदल्यात जे काही मिळेल त्यापेक्षा तुमच्या माथी लागलेला गद्दारीचा कलंक लाखपटीने मोठा असेल. अरे,जे तुमच्या लेकाला उमजले ते तुमच्या सारख्या जख्ख म्हाता-याला कळले नाही ? कालपर्यंत जे तुम्हाला आदराने साहेब बोलत होते,मानसन्मान देत होते ते समाजमाध्यमांवर तुमचा कसा उद्धार करीत आहेत, किती शिव्याशापांची लाखोली वाहत आहेत,यावरून तुमची लायकी ओळखा.
ज्या हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब साहेब ठाकरे यांचा तुम्हाला परिसस्पर्श लाभला,दिर्घकाळ सहवास लाभला व कृपादृष्टी लाभली, त्यांचा तुम्ही घात केला.या वयात तुम्ही नातवाच्या वयाच्या आदित्यला आधार द्यायचा सोडून गद्दारांच्या टोळीत सामिल झालात ? तुम्हाला शिवसेनेने मान‌ दिला आणि तुम्ही शिवसेनेची मान कापू इच्छिणाऱ्या खाटकांच्या जमातीत सामील झालात ?थूत तुमच्या जिंदगानीवर ! आयुष्यात जे कमवले ते मातीमोल केले.
तुमचे वय तिरडीवर जाण्याचे असताना तुम्ही कुठे गेलात ? आत्ता तुमच्या अंत्ययात्रेत एकही निष्ठावंत नसेल,मग काय कमवले व काय गमावले ?
तुमच्या पेक्षा आमच्या सारखे सर्वसामान्य शिवसैनिक लाख पटीने भाग्यवान आहेत.व्यक्तिशः मला काहीही मिळाले नाही तरी मी सन्मानाने व निष्ठेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना प्राणपणाने साथ देत आहे. त्या संजय राऊतांचे उदाहरण घ्या,जेलमध्ये जाणे पसंत केले पण झुकले नाहीत,
स्वाभिमानाचा सौदा केला नाही. नवी मुंबईचे एम.के.मढवी यांनी तडिपारि पत्करली पण झुकले‌ नाहीत. बंड्या साळवी यांना किती त्रास दिला पण ते ठामपणे व निष्ठेने उभे आहेत. दिघे साहेबांचे पुतणे केदार दिघेंवर खोटे आरोप केले, असा किती तरी आतंक व उच्छाद या सत्तेचा माज आलेल्या मुजोरड्यांनि असंख्य निष्ठावंतांवर केला पण ते झुकले नाहीत. कालपरवा पर्यंत शिवसेनेचे विरोधक म्हणवणारे उद्धव ठाकरे यांच्या हिंदूत्वाचे व्यापक विचार पटल्याने शिवसेने सोबत आले आहेत,
असे असताना उभं आयुष्य शिवसेनेत घालवलेले लोक गद्दारांच्या टोळक्यात सामिल होत आहेत,याचे सखेद आश्चर्य वाटते व संताप येतो.शिवराय असते तर एकेकाला हत्तीच्या पायदळी तुडवले असते किंवा कडेलोट केला असता.
शिंदे सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या विलंबाचा गैरफायदा घेत शिवसेनेचे जास्तीत जास्त नुकसान करण्याच्या खुनशी वृत्तीने वागत आहे. शिवसेनेचा हरकाम्या थापा आला तरी शिवसेनेला भगदाड पडले असे ओरडत आहेत. निहार ठाकरे,ज्याची राजकीय पार्श्वभूमी शून्य आहे,त्याला व्यासपीठावर आणुन तिर मारल्याचा आव आणत आहे. जयदेव ठाकरे यांचे बाळासाहेब असतानाच त्यांच्याशी जमत नव्हते,ज्यांनी बाळासाहेबांना अतोनात मनस्ताप दिला ,ज्याने 3 लग्नं केली त्या जयदेव ठाकरे कडून‌ व्यासपीठावर स्वतःचे कौतुक करून घेत आहेत. हा फुगा व भ्रमाचा भोपळा लवकरच फुटणार आहे.जे‌ शिंदेंच्या नादी लागत आहेत ते बुडणा-या नौकेत बसले आहेत.या नौकेचा स्वयंघोषित नायक,कप्तान स्वतः बरोबर सर्वांना घेऊन बुडणार आहे,कधी ते येणारा काळच ठरवेल.
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार व शिवसैनिक
उल्हासनगर
9822902470

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!