ग्राम स्वच्छतेच्या माध्यमातून राष्ट्रपित्यास विद्यार्थ्यांनी वाहिनी आदरांजली…
प्रतिनिधी:- प्रा. तुषार वाबळे
भारताचे राष्ट्रपिता सत्य आणि अहिंसेचे पुरस्कर्ते महात्मा गांधी आणि स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान” जय जवान जय किसान ” या घोषणेचे प्रणेते लालबहादूर शास्त्री या दोन्ही महात्म्यांची जयंती रयत शिक्षण संस्थेचे, भैरवनाथ विद्यालय भिगवण येथे विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरी करण्यात आली . यावेळी रविवार सुट्टीचा दिवस असूनही विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये उपस्थिती दर्शवून उस्फुर्त सहभाग नोंदवला. सर्वप्रथम दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनचरित्र विषयी भाषणाच्या माध्यमातून मनोगते व्यक्त केली.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे दिव्यांग उपशिक्षक श्री.वणवे बी.एस यांनी भूषविले. यावेळी भाषणात बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना गांधीजींच्या जीवनातील स्वावलंबन तर लालबहादूर शास्त्री यांचा देशातील तळागाळातील घटकांसाठीचा त्याग स्पष्ट केला. विद्यार्थ्यांनी देखिल भाषणासाठी उत्स्फूर्तपणे टाळ्यांचा गजर करत प्रतिसाद दिला. कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढून स्वच्छतेबाबत घोषणा दिल्या. तसेच भैरवनाथ मंदिर ,ग्रामपंचायत व दुर्गादेवी मंदिर या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली.
या कार्यक्रमाला विद्यालयाचे प्राचार्य श्री गावडे एस.एम आणि विद्यालयातील सर्व शिक्षक ,शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी व भिगवन परिसरातील प्रतिष्ठित नागरिक देखील उपस्थित होते.
