स्वातंत्र्यानंतर 75 वर्षे उलटलुनही या गावात एस टी बस सुविधा नाहि.
शाळकरी विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांचे हाल
बसस्थानक बसविना पडले उताने
प्रतिनिधी:संदिप कायगुडे
कर्जत:तालुक्यातील गणेशवाडी या गावात स्वातंत्र्यानंतर 75 वर्षे उलटलुनही या गावात एस टी बस सुविधा नाहि.गावात जेमतेम प्रथमिक शैक्षणिक शिक्षण वगळता येथे शिक्षणाची सोयच नाही. स्वातंत्र्यानंतर या गावात एकदाच बस आली परंतु काही कारणास्तव शासनाने तीही बंद केली.बस सुविधा अभावी गावातील शाळकरी विद्यार्थ्यांचे मोठे अतोनात शैक्षणिक नुकसान होत आहे.तर मुलींसाठी शैक्षणिक ठिकाणी काहीजण येण्या- जाण्याची सोय नसल्याकारणे शिक्षणच सोडून दिले आहे.
बारामती ,भिगवण श्रिगोंदा ,कर्जत ,सिध्दटेक ,दैण्ड बस सुविधा गणेशवाडीमार्गे चालू करावी यामुळे येथिल शाळकरी विदयार्थी,शेतकरी,व्यवसायीक भोगोलिक सुविधापासुन वंचित राहणार नाही.
सन २०१८ साली माजी मंत्रि राम शिंदे यांनी या गावासाठी लाखो रुपायाचे बस स्थानक बांधकाम दिले परंतु आजतागायत या बसस्थानकात कधिच बस दिसलीच नाही. याउलट त्याचा वापर दारु पिऊन झिंगाट झालेल्यांनसाठि केला जातोय हे वास्तव आहे.
गणेशवाडी गाव शंभर टक्के बागायत भाग आसल्याकरणे बस सुविधा चालु झाली तर शाळकरी विदयार्थींचे होणारे नुकसान टळेल.गाव शंभर टक्के बागायत आसल्याने प्रवासाच्या सोयी सुविधामुळे उलट गणेशवाडीत छोटे मोठे व्यवसाय चालू होतील व उलट गाव विकासात भरच पडेल.