दीपक केसरकर चायपेक्षा किटली
गरम : गद्दार देतोय निष्ठेची बांग !!
एकनाथ शिंदे यांनी भाजपाशी संधान साधून शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. आणि सुरू झाली पळवापळवी व पळापळ. या कटकारस्थानांवर पांघरुण घालण्याची गरज होती.त्यासाठी कोणीतरी बोलबच्चन पोपटपंची करणारा प्रवक्ता हवा होता. गद्दारांची वकिली करण्यासाठी गद्दीरीचा पूर्वानुभव असलेला कोणी तरी हवा होता. त्यासाठी चपलखपणे तेथे बसणारा दीपक केसरकर खेरीज योग्य व्यक्ती शिंदेंच्या कळपात नव्हता. त्याचे नांव दिपक केसरकर. दोनवेळा पक्ष बदलणारा, शिवसेनेस टोकाचा विरोध करणारे केसरकर स्वतःला शिवसेनेचे निष्ठांवत व बाळासाहेबांना आदर्श मानणारे केसरकर हे बाळासाहेबांच्या हयातीत शिवसेना विरोधकच होते.
बाळासाहेबांच्या निधनानंतर दोन वर्षांनी ते शिवसेनेत आले. त्यामुळे बाळासाहेबांच्या आदर्शांवर चालणारे व शिवसेनेशी एकनिष्ठ म्हणवणारे केसरकर हास्यास्पद व खुजे वाटतात.
बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे हे संजय राऊतना उद्देशून म्हणाले की, त्यांचा रोजचा मँटनी शो बंद झाला.संजय राऊत यांच्याशी माझेही वैचारिक मतभेद आहेत परंतू संजय राऊत यांनी जेंव्हा हे तथाकथित बंडखोर मुग गिळून गप्प बसायचे तेंव्हा सर्व विरोधकांना अंगावर घेत होते. विरोधकांना तोडीस तोड देऊन नडत होते. त्यांनी कधी उडी,आयटीच्या धमक्यांना भीक घातली नाही,ठामपणे शिवसेना व उद्धव ठाकरेच्या समर्थनात आघाडीवर राहिले. त्यांनी शिंदे व केसरकरांसारखा रणछेडदासपणा दाखवला नाही.
महा विकास आघाडी स्थापनेत संजय राऊत यांचीच भुमिका निर्यायक ठरली होती. याच महा विकास आघाडीत एकनाथ शिंदे व त्यांचे समर्थ अडिच वर्षे यथेच्छ चरत होते.आत्ता अजीर्ण झाले व इडी व आयटीची पीडा मागे लागली म्हणून आपली काळी माया वाचवणे व जेलवारी टाळणे या उद्देशाने भाजपा नेतृत्वापुढे लिन झाले. या सर्व पापकर्मांची पाठराखण करण्यासाठी केसरकर सारखा डाँबरमन रोज शिवसेने विरूद्ध गरळ ओकत आहे.
शिवसैनिकांना शिवसेनेचे महत्व व निष्ठेचे महत्व सांगताना त्यांना आपला पुर्वतिहास आठवत नाही का ? 2014 पुर्वी आपण कोणकोणत्या पक्षाशी एकनिष्ठ होतात आणि कशी निष्ठेची विष्ठा केली ? हे आठवुन पहावे नंतर निष्ठेच्या वल्गना कराव्यात. केसरकर म्हणजे चाय पेक्षा किटली गरम.जो पर्यंत ते शिवसेनेच्या विरोधात व गद्दारांच्या बाजून समर्थनात्मक भंकस करीत राहतील तोपर्यंतच त्यांना गद्दार गट किंमत देईल.नंतर त्यांचा देखील “नारायण राणे” करून टाकतील. या वायफळ बडबडीचे रूपांतर “एखाद्या मंत्री पदाचे हाडूक चघळण्यात होत नाही” तोपर्यंतच किटलीची वायफळ वाफ उडत राहील.
बाटगा हा आपण किती निष्ठावंत आहे हे दर्शवण्यासाठी कट्टरधर्मीयांपेक्षा जोरात बांग देत असतो व सुंता करून घेतल्याचे ओरडून ओरडून सांगत असतो.दीपक केसरकर हा असाच बाटगा व गद्दार आहे.त्याच्या वाहिन्यांवरील बडबडीसही बाटग्याच्या बांगे इतकेच महत्व आहे.
केसरकर हे सावंतवाडीचे आहेत. त्यांच्या निषेधार्थ, त्यांच्या घरावर शिवसैनिकांनी मोर्चा काढला होता व घोषणा काय दिल्या तर नीमका पत्ता कडवा है,केसरकर ××वा है.ज्या मतदारांनी तुम्हाला निवडून दिले ते तुमची निर्भत्सना करतात यावरून त्यांनी काय ते समजावे,ही त्यांची शेवटची निवडणूक ठरेल,यात वाद नाही. सावंतवाडी हे लाकडी खेळण्यांसाठी सुप्रसिद्ध आहे.ही खेळणी प्रारंभी आकर्षक दिसतात,लोक ती खरेदी करून शोकेसमध्येही ठेवतात पण एकदा का त्यांना तडा गेला व तुटले की ते खेळणे फेकुन दिले जाते.
सावंतवाडीच्या केसरकरांचे हे लाकडी खेळणे आत्ता भंगारात काढण्याची वेळ जवळ येऊन ठेपली आहे.तूर्तास ईतकेत !
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
9822902470
कै. रामचंद्र शंकर सुतार यांचे अल्पशा आजाराने निधन

प्रतिनिधी: समाधान रजपूत.
दिनांक: २६/०७/२०२२
पिंपरी बुद्रुक येथील कुशल कारागीर म्हणून ओळख असलेले व पिंपरी बुद्रुक पंचक्रोशी मध्ये सुतार कामासाठी प्रसिद्ध असणारे कै. रामचंद्र (भाऊ) सुतार वय वर्ष ८१ यांचे दुःखद निधन झाल्यामुळे सुतार परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या पश्चात दोन मुले व नातवंडे असा मोठा परिवार आहे दादासाहेब सुतार यांचे ते वडील होते.