अजिततदादा म्हणजे प्रत्येकाने अनुकरण करावे असा नेता!
(निलेश गायकवाड )
जिल्ह्यातील घडामोडींवर त्यांचे अतिशय बारीक लक्ष असते.जिल्ह्यातील शेती, सिंचन, भाजीपाला, साखर कारखाने, विविध शैक्षणिक, सामाजिक संस्थांसह विकासकामांचे विषय ते प्राधान्याने मार्गी लावतात, असा सगळ्यांचा अनुभव आहे.
अजितदादा अगदी पहाटे काम सुरू करतात. त्यांनी सुरू केलेले काम अगदी रात्री एक-दीड पर्यंत चालते. वर्षातील सर्व दिवस सलग व न थांबता, कंटाळता काम करणारा अन्य नेता सापडणार नाही. सध्या ते राज्याचे विरोधी पक्ष नेता म्हणून व माजी उपमुख्यमंत्री आहेत. कोरोनाचा मुकाबला करणाऱ्या प्रशासनाचे मनोबल वाढविण्यासाठी सबंध महाराष्ट्र पालथा घातला आहे. तसेच पक्षबळकटी साठी अनेक जिल्ह्यात जाऊन त्यांनी आढावा बैठका घेतात . तेथील कामकाज कसे चालते, त्यात काय सुधारणा हव्यात, कशी कार्यशैली असावी याबाबत ते अत्यंत जागरूकपणे दिशादर्शन करीत असल्याचे दिसते . त्यामुळे मतदारसंघातील नागरिकांच्या समस्यांचे निवारण कसे करावे, विकासकामांना कशी गती द्यावी याबाबत अनेक आमदारांना ते स्वतः सांगतात. एवढा बारीकसारीक तपशील त्यांच्याकडे असतो.

अजितदादांच्या कामाचा झपाटा, विकासाची दृष्टी पहायची असेल तर आजचे पुणे शहर व सभोवतालचा परिसर त्याची साक्ष देतो. सर्वांत वेगानं विस्तारलेलं नियोजनबद्ध विकसित शहर म्हणजे पिंपरी-चिंचवड बरोबर बारामती म्हणता येईल. कोणतेही शहर व त्याच्या सुविधांचा विस्तार करताना त्यामागे कोणाचा तरी खंबीर पाठिंबा लागतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी त्यासाठी आपले योगदान दिले आहे. त्याच पद्धतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा त्यात सिंहाचा वाटा आहे. गेल्या पंचवीस वर्षांत राजकीय व प्रशासकीय ताकद देऊन या शहराचा चेहरामोहरा त्यांनी बदलला. हे शहर नावारुपाला आले. विविध उद्योगांनी येथे आपला विस्तार केला. त्यातून नव्या देशातील पिढीला हे शहर आकर्षित करू लागले आहे.
अनेकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या. उद्योगांची मुहूर्तमेंढ रोवण्यात आली. एकविसाव्या शतकाला साजेसे हे शहर करण्यात अजितदादांचे योगदान त्यात प्रकट झालेले दिसते. त्यामुळे नव्या पिढीला राजकारणात येताना, कसे काम करावे, त्यांच्यापुढे कोणाचा आदर्श असावा तर त्यात दादांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाईल. प्रशासनावर असलेली त्यांची पकड, कामाचा वेग, वेळेला महत्त्व आणि काटेकोरपणा, रोखठोक बोलणे व कामाचा मोठा आवाका हे सर्व निर्णयक्षमतेमुळे त्यांनी साध्य केले आहे. त्यामुळे सर्वच वयोगटांतील मतदार, नागरिक जो त्यांच्या संपर्कात येतो, तो त्यांच्या प्रेमात पडतो. त्यामुळे केवळ राजकारणच नव्हे तर विविध क्षेत्रांतील मंडळी त्यांच्या कामाला दाद देतात.

कामकाजाची पद्धत फारच शिस्तबद्ध आहे. एखाद्या कामाचे पत्र आपण त्यांना दिल्यानंतर कदाचित ते आपल्याही लक्षात राहणार नाही, मात्र त्यांनी त्याची दखल घेतलेली असते. जेव्हा त्यांच्या ऑफिसमधून फोन येईल तेव्हा कळायचे. त्या कामाबाबतची मीटिंगही लावून संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थितीही आवर्जून असते. कमी वेळेत साधकबाधक चर्चा करून समयसूचकता दाखविण्यात त्यांचा हातखंडा आहे. कामाची नोंद इतिवृत्तात नोंदवून त्याला वैधानिक स्वरूप देण्यावर त्यांचा भर असतो. ज्या गोष्टी स्वतःच्या अखत्यारित नसताना त्या आदेशित करून तो प्रश्न सोडविण्याची त्यांची क्षमता खरोखरच वाखाणण्याजोगी आहे.अश्या आदर्श नेत्याला वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा