June 30, 2025 9:19 am

इडी देवतेचा जय हो !

अपनी भाषा में पढ़े! Translate

इडी देवतेचा जय हो !

अधिकारी आणि पुढारी अतोनात अपहार करतात.रोज पेपरला बातमी येते.लोक तोच धागा पकडून माहिती काढतात.अचूक माहिती मिळाली कि तक्रार करतात.कोणाकडे? वरिष्ठ अधिकारी कडे.तो तर लहान्याचा बाप असतो.लहान्या कवडीचोर तर हा महाचोर.त्याच्याकडे अर्ज टाकला कि तो वाचत सुद्धा नाही.जास्त दिवस झाले कि, स्वताला देशभक्त समजणारा तक्रारदार त्या आधिकारीची भेट घेतो.तहसिलदार,बीडीओ, कलेक्टर,सीईओ,कृषी अधिक्षक,अधिक्षक अभियंता.आधिकारी अर्ज घेतो.त्याची लगेच खात्री होते कि,हे अपहाराचे काम तर मीच सांगितले होते.यातून माझे मला मिळालेत.तेंव्हा तो अधिकारी तक्रार ठेवून घेतो.वाटल्यास देतांना फोटो काढू देतो.हा तितकाच खुष.मी आज कलेक्टर ला भेटलो.मी आज सीईओ ला भेटलो. खरे म्हणजे हा अधिकारी प्रामाणिक असेल तर त्याने ताबडतोब त्या चोराला संबंधित फाईल घेऊन बोलवले पाहिजे.तक्रारदार आणि तो सरकारी चोर आमने सामने करून तेथेच कारवाई केली पाहिजे.पण या देशाचे दुर्भाग्य आहे कि,आता असे प्रामाणिक अधिकारी जन्माला घालणे बंद केले आहे.म्हणून तो बघतो,पाहातो,असे सांगून तक्रारदाराला वाटाण्याच्या अक्षता लावतो.
मी अभ्यासपुर्ण सांगतो,मी ठामपणे सांगतो,कि असा टाईमपास करणारा अधिकारी स्वतः चोर असतो.त्यानेच अपहाराचे मिशन सक्सेस करण्याचे आदेश अधिन अधिकारी व कर्मचाऱ्याला दिलेले असतात.तुम्ही तक्रार दिल्यावर खात्री होते कि,मिशन सक्सेस झालेले आहे.तुम्ही गेल्यानंतर तो अधिकारी संबंधित लहान चोराला फोन करतो.” का रे! तू तर जास्त माल मारला आहे.मला कमी पाठवला आहे.बाकीचा ताबडतोब पाठवून दे, नाहीतर मी तुझ्यावर कारवाई करतो.” असा सज्जड दम मिळाल्यावर तो चोर पहिल्या गाडीने साहेबाची खुशाली घेऊन हजर होतो.असाच दम तक्रारदार समोर दिला असता तर?
दोन तीन महिने निघून जातात.नंतर तो कंटाळतो.उपोषण ची नोटीस देतो.हे अधिकारी पोलिसांना पत्र देतात.याचा बंदोबस्त करा.हा अपहार विरोधात उपोषण करीत असेल तर तुमच्या स्टाईलने परावृत्त करा.अपहार करणे हेच सरकारचे काम आहे.यातूनच आम्ही मंत्रीला हप्ते देतात.मंत्री मुख्यमंत्री ला देतात.पोलिस काहीही विचार न करता सरळ त्या नागरिकाला मेमो देऊन ,बोलवून,दम देऊन अडकवून ठेवतात.येथे पोलिसांची भुमिका महत्वाची असते.त्यांनीच आधिकारीला पत्र दिले पाहिजे कि, साहेब तुम्ही अपहार केला आहे‌.म्हणून हा माणूस कारवाई ची,वसुलीची मागणी करीत आहे.याला तर तुम्हीच जबाबदार आहात.पोलिसांनी असे केले तर तहसीलदार,बीडीओ, कलेक्टर,सीईओ सुद्धा हवालदार चे चरण धरील‌.पण पोलिस ही चांगली जनसेवेची , कर्तव्याची संधी सोडून चोर आधिकारीला वाचवण्यासाठी तक्रारदाराला छळतात.
तर हा तक्रारदार कंटाळतो.कोणी जेष्ठ नागरिक त्याला पोलिसात तक्रार करायला सांगतात.तो पोलिस स्टेशनमध्ये गेला कि पोलिस तक्रार घेत नाहीत.ते चोर अधिकाऱ्यांना घाबरून असतात.कोर्टात जाण्याचा सल्ला देतात.तेंव्हा हा तक्रारदार कोर्टात खटला दाखल करू पाहातो तर न्यायाधीश म्हणतात,लहान चोराविरोधित खटला दाखल करण्यासाठी मोठ्या चोराची परवानगी आणा.सांबाच्या,काल्याच्या विरोधात गब्बरसींग परवानगी देईल का? तो तर उलटा म्हणेल, “बसंतीको उठाकर लाओ.होलीमे नचाना है.”
असा वैतागलेला तक्रारदार मंत्रीकडे जातो.तो मंत्री अनेकदा फालतू कामात,बाई बाटली मधे व्यस्त असल्याने डेटींग देत नाही.कसेतरी , कुठेतरी भाषणाच्या ठिकाणी शुद्धीवर असतांना पकडले आणि तक्रार दिली कि,सर्वांसमोर सांगतो.” मी एकालाही सोडणार नाही.” याला वाटते,चोराला सोडणार नाही.नाही!तसे नाही! ज्याने अपहार केला त्यांच्याकडून वसुली केल्याशिवाय सोडणार नाही.असे मंत्रीचे म्हणणे असते.
फडणवीस असोत कि ठाकरे असोत यांनी अपहार विरोधात कुठेही कारवाई केली नाही.खडसे असोत कि गुलाबराव पाटील यांनी अपहार विरोधात कधीही मदत केली नाही.उलट कोणी तक्रार घेऊन गेले कि,हेच मंत्री पोलिसांना फोन करून गुन्हा दाखल करतात.

  

अशा अधिकाऱ्यांना,अशा मंत्र्यांना कोणाचाही वचक राहिला नाही.कोणाचीही भीती राहिली नाही.भीती वाटते फक्त इडी ची.या इडी देवतेसमोर सगळेच चोर नरम होतात‌.याच देवतेसमोर चोरांना घाम फुटतो.या इडी देवतेची स्थापना,प्रतिष्ठापना ज्यांनी केले त्यांनी या देशावर,जनतेवर खूप उपकार केले आहेत.या इडी चा विस्तार,वापर ज्या नेत्यांनी केला,त्यांचे या देशावर,या जनतेवर अनंत उपकार झाले.ही इडी ची कारवाई प्रथमतः मा.नरेंद्र मोदींनी सुरू केल्यामुळे चोरांमधे घबराहट ,थराथराहट निर्माण झाले आहे.
इडी देवतीची वक्रदृष्टी झाली कि कांग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना भयभीत होते.ते आंदोलने करतात.” अपहार करणे आमचा घटनादत्त अधिकार आहे.आणि आम्ही तो करणाच! ” असा संदेश जनतेला देतात.पण हे ही सांगतात कि, “आम्ही तर चोर आहोतच तर भाजप चे नेते चोर नाहीत का? त्यांच्यावर का कारवाई करीत नाही?” ही मागणी सुद्धा रास्त आहे.इडी ची कारवाई भाजप सोडून इतर सर्वांवर होत असेल तर आक्षेपार्ह आहेच.यावरून असे सिद्ध होते कि, राजकीय पक्ष या चोरांच्या पंजीकृत टोळ्या आहेत.आम्ही मुक्तपणे चोरी करू.इतरांना करू देणार नाही.हाच इडी चा हेतू समजावा का?
राजकीय नेते म्हणतात,कि इडी चा धाक दाखवून आमचे आमदार भाजपने पळवून नेले.आमचे खासदार पळवून नेले.आक्षेप खरा असला तरी, तुमच्या आमदार, खासदारांनी अपहार तरी करावा? तुम्ही अपहार का करू द्यावा? तुमच्या पक्षातील या चोरांना वेळीच लगाम का लावत नाहीत?हा माझा प्रश्न आहे? त्यांनी अपहार तरी का करावा?जर अपहार केलाच नाही,चोरी केलीच नाही तर इडी ने कपडे उतरवून नागडे केले तर काहीच हाती लागणार नाही.तर डर कशाला?चोर नाही त्याला डर कशाला?

… शिवराम पाटील
९२७०९६३१२२.
महाराष्ट्र जागृत जनमंच.
जळगाव.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!