रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या कृषिदूतांकडून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन
प्रतिनिधी /अजिनाथ कनिचे
वरकुटे खुर्द, ता. इंदापूर येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत रत्नाई कृषी महाविद्यालयातील आलेले कृषिदूत औदुंबर शिंदे ,श्रीनिवास चौधरी ,विराज मगर ,रणजितसिंह भगत ,स्वप्निल ताम्हाणे, आकाश शेलार ,विकास भुई, यांनी वरकुटे खुर्द ,ता.इंदापूर या ठिकाणी कंपोस्ट खत तयार करण्या बद्दल लोकांमध्ये जनजागृती केली.
अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील ,प्राचार्य आर .जी .नलावडे सर, कार्यक्रम समन्वयक प्रा .एस.एम.एकतपुरे सर, कार्यक्रमाधिकारी प्रा .एस.आर .आडत सर ,यांचे मार्गदर्शन लाभले.
बदलत्या हवामानाचा पीक उत्पादनावर जसा परिणाम होत आहे, त्याच प्रमाणे दुसऱ्या बाजूला कमी झालेल्या जमिनीचा कसही कारणीभूत आहे. संकरित जाती आणि पाण्याची पुरेशी उपलब्धता यामुळे शेतकरी एकापेक्षा जास्त हंगामामध्ये एकापाठोपाठ पिके घेत आहे, त्यामुळे जमिनीला विश्रांती मिळत नाही, खते आणि पाण्याच्या अतिरिक्त वापर आणि हजारो जमिनी क्षारपड झाल्या आहेत .आशा मानवनिर्मित समस्या सोडवण्यासाठी उपाय योजावे लागणार आहेत .
शेतामध्ये उपलब्ध असलेला टाकाऊ स्वरूपाचा काडीकचरा, गोठ्यातील जनावरांचे मलमूत्र ,पिकाचे उरलेले अवशेष, तसेच बांधावरील पानगळ इत्यादी अवशेषांचे जिवाणूंचा सहयोगाने कुजवून आपण कंपोस्ट खत तयार करू शकतो, तसेच जमिनीचा कस टिकवण्यासाठी सेंद्रिय पदार्थांचा जमिनीत वापर होणे आवश्यक आहे .त्यासाठी कंपोस्ट खत उपयुक्त ठरते, अशाप्रकारे कृषिदूतानी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.