June 30, 2025 2:28 pm

रत्नाई कृषी महाविद्यालयाचा कृषिदूतांकडून शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे मार्गदर्शन

अपनी भाषा में पढ़े! Translate

रत्नाई कृषी महाविद्यालयाचा कृषिदूतांकडून शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे मार्गदर्शन
प्रतिनिधी / अजिनाथ कनिचे

वरकुटे खुर्द ता. इंदापूर येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत रत्नाई कृषी महाविद्यालयातील आलेले कृषीदूत विकास भुई ,स्वप्निल ताम्हाणे, औदुंबर शिंदे, आकाश शेलार, विराज मगर ,रणजितसिंह भगत, श्रीनिवास चौधरी यांनी वरकुटे खुर्द ( ता. इंदापूर) याठिकाणी माती परीक्षण बद्दल लोकांमध्ये जनजागृती केली.
अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील, प्राचार्य आर जी .नलावडे सर , कार्यक्रम समन्वयक प्रा .श्री .एस.एम.एकतपुरे सर, कार्यक्रमाधिकारी डॉ. डी. एस. ठवरे सर ,प्रा .एस .आर .आडत सर यांचे मार्गदर्शन लाभले.
माती हा शेतीचा मुख्य घटक आहे मातीचे आरोग्य चांगले तर तयार होणाऱ्या पिकांची गुणवत्ता उत्तम. म्हणून मातीत असणाऱ्या घटकांबद्दल बद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करणे गरजेचे आहे माती परीक्षणाचा मूळ उद्देश, जमिनीतील पीक वाढीसाठी कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे हे तपासणे( नत्र ,सेंद्रिय कार्बन ,स्फुरद, पालाश ,सामू इ. ) व ती कमतरता भरून काढण्यासाठी काय आवश्यक आहे आणि त्यासाठी मातीमध्ये काय व किती प्रमाणात मिसळ पाहिजे, याबाबत लोकांना माहिती दिली तसेच मातीचा नमुना कसा घ्यावा ,त्याचे ठिकाण, पद्धत याबाबत लोकांना माहिती दिली .मातीची उत्पादन उत्पादकता सुधारण्यासाठी करायचे उपाय ,आवश्यक अन्नघटक व त्याच्या कमतरतेमुळे पिकांवर दिसणारी लक्षणे याविषयी कृषीदूतांनी प्रात्यक्षिक घेऊन मार्गदर्शन केले अशा पद्धतीने माती परीक्षण करून आवश्यक तेवढेच रासायनिक खतांचा वापर केला तर जमिनीची नापीकता कमी होऊन सुपीकता वाढेल.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!