भारतीय मानवाधिकार रक्षा परिषदेच्या महाराष्ट्र राज्य सहसमन्वयक पदी प्रा सुशील पाटील यांची नियुक्ती
प्रा सुशील पाटील हे अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यरत विटनेर ता चोपडा येथील रहिवासी असून ते प्राध्यापक, भागवतकार,कीर्तनकार म्हणून त्यांची महाराष्टात ख्याती आहे,ते अ.भा. वारकरी मंडळ,जळगाव जिल्ह्याचे सहजिल्हाध्यक्ष तसेच अ.भा. फार्मसिस्ट असोसिएशन चे नाशिक विभाग प्रमुख आहेत.सद्गुरू संत तानाजी महाराज यांच्या परंपरेचे वंशज म्हणून त्यांची ओळख आहे.
प्रा सुशील पाटील यांची नीती आयोग, (भारत सरकार) द्वारा नोंदणीकृत भारतीय मानवाधिकार रक्षा परिषद(Human Rights council of india) च्या “महाराष्ट्र राज्य सह समन्वयक पदी” नियुक्ती करण्यात आली असून सदर नियुक्तीचे आदेश निवृत्त न्यायाधीश व ग्राहक मंच चे माजी अध्यक्ष ब्रिन्दावन मंडल यांच्या सल्ल्याने व जनार्धन मोंडल (नीती आयोग माजी सहसंचालक,ग्राहक मंच चे चेयरमन)आणि चंद्र शेखर डे (नीती आयोग चे सरचिटणीस ), महाराष्ट्र राज्य सरचिटणीस डॉ प्रफुल्ल पाटील यांच्या द्वारे नियुक्ती करण्यात आली.
मानवाधिकार म्हणजे प्रत्येक माणसाला निसर्गदत्त मुलभुत अधिकार, हे अधिकार त्याला जन्मत:च मिळतात व सदर अधिकार अभाधित ठेवण्याची जवाबदारी प्रत्येकाची असते पण,तरीही वेळोवेळी त्यावर आक्रमण होतांना दिसते व ते अभाधित राहण्यासाठी प्रयत्नांची तसेच सतत जागरुक राहण्याची आवश्यकता असते.
आयोगाला प्राप्त होणार्या ५० टक्के केसेस कार्यक्षेत्रात न बसणारी असतात या नॉन मेन्टेनेबल केसेस संदर्भात जनजागृती करणे, मानवी हक्काचे ऊल्लंघन झालेल्या प्रकरणांची जवाबदार यंत्रणेला दखल घेण्यास मदत करणे, मानवतेचा प्रचार करणे आदी कार्य या माध्यमातुन केले जातात.
या निवडी बद्दल प्रा सुशील पाटील यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.