महाराष्ट्रात हया गावची यत्रा होतीय जरा हटके
गावकरी करतात यात्रेनिमित्त रक्तदान
पोलीस निरीक्षकासह आरोग्य अधिकारी,हार्ट व किडनी ट्रान्सप्लांट केलेल्या व्यक्तींनी नोंदविला सहभाग
प्रतिनिधी संदीप कायगुडे
कर्जत. महाराष्ट्रातील या गावच्या यात्रेची चर्चा कायम चर्चेत राहते. हा गाव म्हणजे कर्जत तालुक्यातील गणेशवाडी. भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त यावर्षी गावकऱ्यांचा संकल्प जरा हटके आहे.सर्व गावकऱ्यांनी एकत्र येत या वर्षी जरा काही वेगळेच करावे असे सर्वांच्या मनात होतं. सर्वांनी एकमताने यावर्षी भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त रक्तदान करण्याचा निर्णय घेतला.
या रक्तदान शिबिरास कर्जत पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव , प्राथमिक आरोग्य केंद्र बारडगाव सुद्रिकचे डॉक्टर ,
खेड येथिल हर्ट ट्रान्सप्लांट झालेला गणेश काळे व आपल्या मुलास किडणी दान केलेली आई यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
अश्या गावकऱ्यांचे महाराष्ट्रभरातून कौतुक होत आहे.
उदयाच्या मंगळवार दि. 10 व बुधवार 11 एप्रिल रोजी या गावची यात्रा होणार आहे. भिमा नदीकाठचा गाव आसल्याकारणे बहुतांश भाग हा बागायतदार कृषी पदवीधरांची संख्या जास्त आहे. गावातील बहुतेक जण शासकीय सेवेत, व्यवसायिक, शेतकरी ,व्यापार वर्ग आहे.
या गावचे गावकरी जर काय हटकेच करत आहेत. गतवर्षी कोरोना काळात अनेकांना आपल्या जवळच्यांना गमवावे लागले.गावातीलच आनेकांच्या बाबतीत आसे घडले. बहुतेक जणांना रक्ताची कमतरता भासू लागली होती. रक्त मिळवण्यासाठी खूप काही प्रयत्न करावे लागले.कोरोना काळात आपल्याच जवळचांचा प्राण जातांना समोर पहावे लागले. यामुळे गावकऱ्यांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून यावर्षी अनंत ऋषी चारीटेबल ट्रस्ट ब्लड बँक अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त संपूर्ण गावकऱ्यांनी रक्तदान करण्याचा निर्धार घेतला. दिनांक 10 रोजी नाथ महाराजांची पालखी सोहळा व दिनांक 11 रोजी रक्तदान व कुस्ती आखाडा आहे .

रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे
बुधवार दि.11रोजी सकाळी 11ते 5 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरास आलेल्या सर्व रक्तदात्यास आनंदऋषी चारीटेबल ट्रस्ट ब्लड बँक अहमदनगर यांच्यामार्फत रक्तदान केले गेलेले सर्टिफिकेट दिले जाणार आहेत.
याचा फायदा आसा कि
ज्या रक्तदात्याने रक्तदान केले आहे अश्या रक्तदात्यास किंवा त्याच्या फॅमिली इमर्जन्सी काळात फुकट पुरवठा केला जाईल. रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे. असे आनंद ऋषी चारीटेबल ट्रस्ट ब्लड बँक अहमदनगर त्यांनी यावेळी सांगितले.
रक्तदान शिबिरास सर्व गावकऱ्यांनी सहभाग नोंदवावा असे आव्हान समस्त गणेशवाडी युवक ,भैरवनाथ यात्रा कमिटीने केले आहे.