सर्व सामान्य व्यक्तीचा नवस पूर्ण केला राज्यमंत्र्यांनी
(निलेश गायकवाड )
बारामती तालुका प्रतिनिधी निंबोडी तालुका इंदापूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त श्री दत्तात्रय(मामा) भरणे,(राज्यमंत्री तथा पालकमंत्री सोलापूर) हे आले असताना त्यांना,त्यांचे कट्टर समर्थक माजी सरपंच हनुमंत घोळवे श्री दिपक खाडे व श्री रुपेश शिवाजी घंबरे यांच्याकडून माहिती मिळाली की निंबोडी गावातील सर्वसामान्य व्यक्ती श्री राजेंद्र सुभेदार चव्हाण यांचा श्री मारुतीरायाच्या चरणी नवस असा आहे की जोपर्यंत मामा निवडून येत नाहीत व मामा निवडून आल्यानंतर मामांच्या हातून मारुतीरायाच्या चरणी नारळाचे तोरण बांधत नाही,तोपर्यंत मंदिरांमध्ये पाय ठेवणार नाही,असा त्यांचा नवस होता ही माहिती मिळताच मामांनी आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर आपल्या गाड्यांचा ताफा मारुतीरायाच्या मंदिराकडे वळवला व श्री राजेंद्र सुभेदार चव्हाण यांचा नवस सन्माननीय मामांनी मारुतीरायाच्या चरणी नारळाचे तोरण वाहून पूर्ण केला तसेच श्री संत भगवान बाबा वामनभाऊ दर्शन घेऊन कार्यक्रमाचे आभार डॉक्टर महेश घोळवे समस्त ग्रामस्थ मंडळी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.