अप्पासाहेब पवार यांचा 22 वा स्मृतिदिन
आमदार रोहित पवारांच्या आई सुनंदाताई पवार यांनी दिल्या आप्पासाहेब पवारांच्या आठवणींना ऊजाळा
प्रतीनिधी.संदिप कायगुडे
आज माझी सुनंदा पवार जी ओळख आहे. यासाठी शैक्षणिक व सामाजिक कामासाठी ज्यांनी मला संधी दिली सतत प्रेरणा दिली म्हणून आज 25 वर्ष सार्वजणीक जीवनात खंबीरपणे काम करतेय ते म्हणजे अप्पासाहेब पवार माझे सासरे .

16 एप्रिल कै. अप्पासाहेब पवार यांचा स्मृतिदिन बघता बघता 22 वर्ष होतील. पवार कुटुंबात सुन म्हणून आल्यानंतर अप्पासाहेब यांना पपा व सासुबाई यांना आई म्हणायचे. पपाचा स्वभाव खुप कडक व शिस्तीचा आम्हा सगळ्यांनाच आदरयुक्त भिती वाटायची. सतत काम करीत राहाणे त्यांना आवडायचे. पुस्तकं म्हणजे त्यांना पुस्तकांचे व्यसनच होते. त्यांची स्वतःची खुप मोठी लायब्ररी होती. अनेक मान्यवर लेखक, शेती विषयक तंत्रज्ञान, डेअरी, पोल्ट्री विविध विषयांवरची खुप ग्रंथसंपदा त्यांनी जमवली होती. पहाटे उठून वाचन करने. नोट्स काढणे. त्यांना शिवाजी महाराज यांच्यावर बोलायला खूप आवडायचे शिवाजी महाराजांचे वेगळेपण हा त्यांचा बोलण्याचा विषय होता. 2 तास या विषयावर बोलायचे..खुप ग्रंथ वाचून, अनेक इतिहासकारांसोबत चर्चा करून खुप माहिती शिवाजी महाराजांविषयी घेतली होती. इतर अनेक विषयावर ते अभ्यासपूर्ण बोलायचे शेती, ठिबक सिंचन, गायी व डेअरी, पोल्ट्री व्यवसाय, यांवरही अतिशय गाढा अभ्यास होता. महात्मा ज्योतीबा फुले, सावरकर, अहिल्याबाई होळकर यांच्या कामाबददल खुप आदर होता. महाराष्ट्रभर ते या सर्व विषयांवर व्याख्यान देत फिरायचे. हजारो शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कुटुंबासाठी कमी वेळ दिला. पण अनेक कारखाने उभे केले.

हजारो हातांना रोजगार मिळवून द्यायचे काम त्यांनी केले. त्यांची कामावर श्रध्दा होती. अंधश्रद्धा व इतर अवडंबर याना विरोध होता.

विज्ञानवादी होते. वरुन खुप कडक वाटायचे तसेच ते माया ही करायचे. चुका समजुन सांगायचे. कोणत्याही कार्यक्रमाला वेळेवर जायचे. वेळेचे पक्के होते. शारदानगरची सुरुवात करताना ग्रामीण भागातील मुलगी शिकली पाहिजे. उत्तम शिक्षण, संस्कार, शिस्त या अॅग्रीक्लचरल डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्थेत त्यांनी रुजवले तेच सर्व पुढेही आम्ही सर्वजणांनी चालु ठेवले आहे. आज संस्था एक विशिष्ट ऊंची वर पोहोचली आहे. कर्मविर आण्णांचे संस्कार अप्पासाहेब यांच्यावर होते. त्यांच्या सान्निध्यात अप्पासाहेबांना राहाण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे शिक्षणात काम करताना कर्मविर आण्णांचे संस्कार कायम त्यांच्या बरोबर होते. त्यांच्यासोबत मी माझ्या शैक्षणिक व सामाजिक कामाची सुरुवात केली. मिटींग, फाईल, संस्था कशी पाहायची इ .अनेक गोष्टीं त्यांनी शिकवल्या कायम त्याच पद्धतीने काम करीत आले.

शांतिनिकेतन चे त्यांचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करीत आहोत. केला आहे. आयुष्य जगत असताना काही तत्व, नियम त्यांनी कायम पाळले. कधीही तडजोड केली नाही. शेवटच्या श्वासापर्यंत शेतकरी, मुलींचे शिक्षण, व्याख्यान देने अशी काम करीत राहिले. ते गेले पण दिलेले संस्कार मात्र आमही कायम जपणार आहोत. कायम समाजहिताचाच विचार करून अॅग्रीक्लचरल डेव्हलपमेंट ट्रस्ट ही संस्था शेतकरी, शेतीपूरक व्यवसाय, शिक्षण, पाणी, आरोग्य, या प्रश्नावर काम करत आहे व करत राहाणार. अप्पासाहेब शरीराने गेले असतील पण संस्कारांनी ते या मातीत, माणसांमधे आहेत व राहातील. आज 16 एप्रिल ला त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली 🙏
