मागण्यांबाबत अधिकाऱ्यांचे सहकार्याचे आश्वासन
शिरपूर : तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी 19 एप्रिल रोजी सकाळी 11.30 वाजता शिरपूर येथील वीज कंपनी कार्यालयावर भाजपा पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, शेतकऱ्यांसह मोर्चा काढण्यात आला असून विविध मागण्या मांडण्यात आल्या.शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमदार काशिराम पावरा यांच्या नेतृत्वाखाली करवंद रोड वरील आमदार कार्यालयापासून शिरपूर येथील वीज कंपनी कार्यालयावर शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी झाले होते.मोर्चा मध्ये यावेळी तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन भूपेशभाई पटेल भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हा बँक संचालक प्रभाकरराव चव्हाण, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, ऍड. बाबा पाटील, जि. प. सदस्य देवेंद्र पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, उपसभापती इशेंद्र कोळी, सुभाष कुलकर्णी, भटू माळी मांडळ, जिल्हा सरचिटणीस अरूण धोबी, तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, जिल्हा चिटणीस चंद्रकांत पाटील शिंगावे, कारखाना उपाध्यक्ष दिलीप पटेल, कारखाना संचालक जयवंत पाडवी, समाज कल्याण सभापती सौ. मोगरा पाडवी, जि. प. सदस्या सौ. बेबाताई पावरा, जि. प. सदस्या सौ. जताबाई पावरा, पिळोदा उपसरपंच योगेश बोरसे, जि. प. सदस्य योगेश बादल, रमण पावरा, कैलास पावरा, कारखाना संचालक भरत पाटील, राजेंद्र पाटील बोराडी, शेतकरी फाउंडेशन अध्यक्ष रणजितसिंग रावल वाठोडा, गुलाबसिंग चौधरी, नारायणसिंग चौधरी, संजय पाटील, नितीन गिरासे, भुपेश परदेशी, अविनाश पाटील, राजकपूर मराठे, जयपाल राजपूत, राजेंद्र पाटील अजंदे, निंबा पाटील बाळदे, भालेराव माळी, जितेंद्र सूर्यवंशी, सुका भिल, मनोज सोनवणे साकवद, बबन भिल वाडी, पंडित धनगर, बागल्या पावरा, हिरालाल पावरा, संग्रामसिंग राजपूत अहिल्यापूर, जनार्दन पाटील, नामदेव चौधरी वाडी, प्रकाश चौधरी, सुनिल सोनवणे, यतिष सोनवणे, डिगंबर पाटील, रोहित शेटे, मुबिन शेख, विक्की चौधरी, अमोल पाटील, नंदू माळी, राजूलाल मारवाडी, नाना पाटील, रविंद्र गिरासे, सोमनाथ सोनार, अतुल पाटील, भाजपा पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपस्थित पदाधिकारी, शेतकरी बांधवांनी अधिकार्यांवर रोष व्यक्त करीत आपल्या मागण्या परखडपणे मांडल्या व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही येथून हटणार नाहीत अशी भूमिका सर्वांनी घेतली होती.यावेळी उप कार्यकारी अभियंता डी. एम. पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने व विविध मागण्यांबाबत आश्वासन दिल्याने मोर्चेकरी माघारी परतले.शिरपूर तालुक्यातील शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या धोरणाला कंटाळली आहे. शेतकऱ्यांविरुद्ध असलेल्या वीज कंपनीच्या धोरणाबाबत जाब विचारण्यात आला. कृषी क्षेत्रात चक्राकार पद्धतीने शेतकऱ्यांना आठ तास नियमितपणे वीजपुरवठा केला जात होता. परंतु आता तसे न होता उन्हाळ्यात फक्त तीन तास विद्युत पंपांसाठी शेतकऱ्यांना वीज मिळत आहे, विजेचा प्रवाह कुठेही मोजला असता 440 वोल्ट दिसून येत नाही जेमतेम 200 वोल्ट पर्यंत विद्युत पुरवठा म्हणजेच कमी दाबाने मिळत असल्याने पूर्ण क्षमतेने विद्युत पंप सुरू होऊ शकत नाही. उन्हामुळे लोंबकळलेल्या विद्युत तारा एकमेकांना स्पर्श होऊन विद्युत पंप, ट्रांसफार्मर, स्टार्टर जळण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात होत असून शेतकरी बांधवांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. जेव्हा शेतकरी विद्युत कनेक्शन घेतो तेव्हा त्याच्याकडून करारनामा केला जातो, परंतु पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा न केल्यामुळे करारनामाचा एक प्रकारे वीज कंपनी भंग करीत आहे. करारनामा प्रमाणे वीज पुरवठा करण्याची बांधिलकी वीज कंपनीवर आहे. बागायतदार शेतकरी वीज किमान आठ तास मिळेल या हिशोबाने पिकांची लागवड करतो, परंतु ती न मिळाल्याने एक प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. अशा सर्व बाबींचा विचार करुन शेतकर्यांना नियमित विद्युत पुरवठा व्हावा व शेतकऱ्यांचे होणारे नुकसान मिळावे, त्या नुकसान भरपाईचा दावा वीज कंपनीवर का करण्यात येऊ नये, शेतकऱ्यांच्या मालमत्तेचे व जीविताचे बरे-वाईट झाल्यास वीज कंपनीवर गुन्हा दाखल करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. शिरपूर तालुक्यात सध्या 3, 4 दिवस सोडल्यास वीज पुरवठा अनियमित होत असून लोडशेडिंगचे वाढते प्रमाण, अनेक ठिकाणी फक्त तीन तास वीज मिळते, अनावश्यकपणे विद्युत पुरवठा खंडित केला जातो, कमी दाबाने वीज पुरवठा होतो, नियमितपणे कधीच वीज पुरवठा सुरळीत राहत नाही, बागायती पिकांना फक्त तीन तासच वीज पुरवठा होणे, यामुळे पिकांना जीवदान कसे मिळणार. शेतकरी बांधव वीज कंपनीच्या धोरणाला पूर्णपणे कंटाळले असून वीज पुरवठा सुरळीत व नियमित होण्यासाठी अशा विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.