June 30, 2025 11:59 am

कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचा पुढील हंगाम 16 लाख टन गाळप करण्याचा संकल्प -माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

अपनी भाषा में पढ़े! Translate

कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचा पुढील हंगाम 16 लाख टन गाळप करण्याचा संकल्प -माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

इंदापूर प्रतिनिधी – आदित्य बोराटे

कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या 32 व्या ऊस गळीत हंगामामध्ये यशस्वीरित्या 11,12,500 मे. टन गाळप केल्याबद्दल सर्व कामगार बंधू, ऊस वाहतूकदार यांना स्नेहभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी बोलताना राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले की सर्व सभासद शेतकरी, ऊस वाहतूकदार, कामगारांच्या वतीने कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याने पुढील हंगामात 16 लाख टन गाळप करण्याचा संकल्प केला आहे.

   हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' सर्वांनी सहकार्य केल्याने विश्वासाने, पारदर्शकपणे आपण 11 लाख टनांपेक्षा जास्त उसाचे गाळप केले असून पुढील हंगामामध्ये 16 लाख टन गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कर्मयोगी शंकररावजी पाटील यांनी ही कारखानदारी उभा केली असून इंदापूर तालुक्याला वैभव मिळवून दिले आहे. आज नीरा भीमा सहकारी साखर कारखाना व कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून 18 लाख लाख टन उसाचे गाळप झाले आहे.

कर्मयोगी कारखान्याच्या माध्यमातून 600 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. या कारखान्याने एकही दिवस क्लिनिंग घेतले नाही. महाराष्ट्राच्या पहिल्या दहा कारखान्यांमध्ये आपला समावेश होण्यासाठी आपणास प्रयत्न करावयाचे आहे.

कारखान्याचे व्हाईस चेअरमन भरत शहा यांनी सर्वांचे सहकार्य झाल्याने हे उद्दिष्ट आपण पूर्ण केले असून उद्दिष्ट समोर ठेवून कार्य केल्यास यश संपादन करता येईल असे मत व्यक्त केले. अशोक पवार यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

कारखान्याचे कार्यकारी संचालक देवराव लोकरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले. आभार संचालक राहुल जाधव यांनी मानले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!