तांदुळवाडी येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती उत्साहात साजरी..!
प्रतिनिधी / अजिनाथ कनिचे
भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे, भारताच्या इतिहासातील तेजस्वी असे प्रज्ञासूर्य ज्यांच्या ज्ञानतेजाने कोट्यवधी जनतेची आयुष्ये उजळली…
आधुनिक भारत घडवून आणण्यासाठी अमूल्य असे योगदान देणारे कृतिशील महापुरुष … स्वातंत्र्योत्तर भारताचे पहिले कायदा व न्यायमंत्री आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार ज्यांनी स्वातंत्र, समता, बंधुता, न्याय अशा तत्त्वांवर आधारित राज्यघटना तयार करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देत भारताच्या उज्ज्वल भविष्याची दिशा ठरविली.. ज्यांनी हजारो वर्षे बहिष्कृत करण्यात आलेल्या समाजाला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली, मूलभूत हक्कांची जाणीव करून दिली व त्यांना संघटित केले; त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, अन्यायाविरूध्द लढण्याची जिद्द, वाईट चालीरीती सोडून देण्याची प्रवृत्ती, शिक्षणाची आवड निर्माण करून त्यांचा स्वाभिमान जागृत केला असे महापुरुष…
आपल्या क्रांतिकारी विचारांनी ज्यांनी सामाजिक अभिसरण घडवून आणत राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक व सामाजिक जीवनात अस्पृश्यांना मानाचे स्थान मिळवून दिले आणि वर्ग, जात, धर्म, लिंग ह्यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार मिळवून दिले असे महानायक… पहिले भारतीय अर्थशास्त्र व राज्यशास्त्र ज्ञानशाखांतील तज्ज्ञ व्यक्ती तसेच निष्णात कायदेपंडित…. ज्यांनी दीन दलित समाजाला शांती आणि समता यांची शिकवण देणारा बौद्ध धम्म दिला… या विविध क्षेत्रांत काम केलेला जगात बाबासाहेबांसारखा एखादाच नेता म्हणून त्यांचे स्थान अढळ आहे.

अशा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन ज्येष्ठ नागरिकांनी केले.
यावेळी सरपंच रणजीतसिंह पाटील, उपसरपंच किरण गवळी, माढा पोलीस स्टेशन चे शेख साहेब, अजिनाथ बापू) परबत, अमोल उबाळे, गणेश परबत, शांतीलाल गवळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या वेळी कुबेर (बप्पा) गवळी, नामदेव नाना भोसले, नागनाथ जाधव, नागनाथ गायकवाड, भैय्या सोनवणे, चंदन साळवे, बापूराव सोनवणे, जंगल सोनवणे, दयानंद सोनवणे, विलास लंकेश्वर, संभाजी गवळी, दिगंबर गवळी, नवनाथ जाधव, जानराव गुरुजी तसेच गावातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.