June 30, 2025 9:52 am

उठ मराठी माणसा….जागा हो, क्रांतीचा धागा हो!

अपनी भाषा में पढ़े! Translate

कोणतीही राजकीय पार्श्वभुमी नसलेला एका सामान्य मराठी कुटुंबातील तरुण पुढे येतो, शिवसेनाप्रमुखांच्या तालमीत घडतो, शिवसेना आणि मातोश्री सर्वस्व मानून एकनिष्ठ राहतो, अन्याया विरुध्द बंड करून लढतो, बेळगाव सीमाभागातील मराठी माणसांच्या लढ्यात आजही मैदानात उतरतो, एक नटी मुंबईचा अपमान करते तेव्हा हाच माणूस मुंबईच्या अस्मितेसाठी उभा राहतो, एक हिंदी चॅनलचा संपादक जेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात एकेरी शब्दात बोलतो तेव्हा हाच माणूस तुटून पडतो आपल्या धारधार लेखणीने अन्यायाला वाचा फोडतो,मराठी माणसांचा आवाज दिल्लीत बुलंद करतो, काहींचे संजय राऊत साहेबं सोबत वैचारिक मतभेद असु शकतील पण जेव्हा महाराष्ट्रासह देशात कुणी बोलायच धाडस करत नाही ते धाडस करणारे एकमेव राऊत साहेब असतात. ईडीच्या भितीने भलेभल्यांना घाम फुटतो तिथे शिवसेनाप्रमुखांचा वाघ एकटा लढतो, आज ईडीच्या धाडी ह्या फक्त मराठी नेत्यांवरच का पडत आहेत? कृपाशंकर सिंह सारखे नेत्यांवर त्याकाळी भाजपने आरोप केले तेच नेते आज भाजप मध्ये जावून पवित्र कसे झाले? याचा विचार तमाम मराठी माणसांनी करायला हवा. राऊत साहेबांसारखा मराठी माणूस जो इथला भुमीपूत्र आहे जो इथल्या मातीशी नाळ जोडलेला आहे. यांसारखी बेधडक रोखठोक भुमीका मांडणारे मराठी नेते ही महाराष्ट्राची गरज आहे. मराठी माणसांचा हा आवाज असाच बुलंद ठेवायचा असेन तर तमाम मराठी माणसांनी राऊत साहेबांच्या मागे ठामपणे उभ रहायला हव आणि दिल्लीश्वरांना दाखवायला हव हा महाराष्ट्र आहे हा कधीच दिल्ली समोर झूकला नाही झूकणार नाही!

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!