राज भवनाच्या प्रवक्त्याचा खोटारडेपणा!
आजच्या दैनिक “सामना” मधे राजभवनच्या प्रवक्त्याने खोटी व दिशाभूल करणारी माहिती दिली आहे. या खुलाश्यात सदर प्रवक्त्याने अर्ध सत्य सा़ंगून खोटारडेपणा करून बोगस पीएचडी प्रदान करणा-यांच्या कृष्णकृत्यांवर पांघरूण घालण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.
सोमवार दि.८ नोव्हेंबर२०२१ रोजी राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत कोविड योद्धा व पीएचडी प्रदान समारंभ असा Banner व्यासपीठावर ठळकपणे दिसत आहे. पदवी दान राज्यपालांच्या हस्ते झाले, असे मी बातमीत कुठेही म्हटलेले नव्हते मात्र सदर कार्यक्रम राजभवन वर झाला व राज भवनवर बोगस पीएचडी देऊन राजभवनचा गैर वापर होत असताना राज्यपालांनी मुकदर्शक असणे ही त्यांची अप्रत्यक्ष संमतीच समजली जाते,असे म्हटले होते.
या कार्यक्रमाचे आयोजक व राज भवन मधील अधिकारी या दोघांनी मिळून राज्यपालांना अंधारात ठेऊन हा पीएचडीचा कार्यक्रम केला हेच दैनिक ‘सामना’ मधील खुलाश्याने सिद्ध होत आहे. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन ओरीसातील महात्मा गांधी पीस फौंडेशनने नव्हे तर महाराष्ट्र राज्य वाहतुक सुरक्षा दल आणि नागरी संरक्षण या संस्थेने केले होते.या संस्थेचे मानद समावेशक मनिलाल शिंपी यांनी २५/०७/२०२१ रोजी कोविड योद्ध्यांचा राज्पालांच्या हस्ते सत्कार करण्याची विनंती केली होती व त्यात महात्मा गांधी पीस फाऊंडेशन व पीएचडीचा उल्लेख नव्हता,असा खुलासा सदर राजभवनच्या अधिका-याने केला आहे.मात्र वस्तुस्थिति काय सांगते तर, राज्यपालांच्या उपस्थितित कोविड योद्धा व पीएचडी प्रदान समारंभ. त्या Banner वर महात्मा गांधी पीस फाऊंडेशचे नांव ठळकपणे झळकत आहे व महाराष्ट्र राज्य वाहतुक सुरक्षा दल व नागरी संरक्षण ज्यांच्या नावाने परवानगी मागितल्याचा दावा राजभवनच्या अधिका-याने आपल्या खुलाश्यात केलाआहे त्यांच्या नावाचा ब
Banner ,वर अस्पष्टसा उल्लेखही नाही. याचाच अर्थ राज्यपालांना अंधारात ठेवत व त्यांची दिशाभूल करून अवैधरित्या अवैध पीएचडीचा बार उडविण्यात आला.
राजभवन सारख्या प्रतिष्ठेच्या वास्तूत अशी बनवेगिरी करणारे व बोगस पीएचडी वाटप करणा-यांना पाठीशी घालणारे अधिकारी असतील तर राज्यपालांनी राजभवनची व स्वत:ची प्रतिष्ठा जपण्यासाठी त्यांची त्वरित हकालपट्टी केली पाहिजे.
दिलीप मालवणकर
ज्येष्ठ पत्रकार
9822902470