जनतेच्या सेवेची हीच वेळ संकटाच्या काळात जनतेसाठी धावल्या अपूर्वा ताई; प्रभाग ८ मध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा
अमळनेर : विक्की जाधव.
शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने अक्षरशः थैमान घातले असून, त्याचा मोठा फटका शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेलाही बसला आहे. बोरी नदीतील मुख्य पाईपलाईन तुटल्याने शहरातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा संकटकाळात नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सौ. अपूर्वा जालंधर चौधरी आणि जालूभाऊ चौधरी यांनी पुढाकार घेत प्रभाग क्रमांक ८ व परिसरातील नागरिकांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली आहे.

संकट कितीही मोठे असो, जनतेच्या प्रश्नांसाठी मैदानात उभे राहण्याची भूमिका अपूर्वा ताई चौधरी यांनी पुन्हा एकदा दाखवून दिली. पावसामुळे निर्माण झालेली आपत्ती, शहरातील विस्कळीत पाणीपुरवठा आणि नागरिकांची वाढती पाण्याची गरज लक्षात घेऊन त्यांनी प्रत्यक्ष नागरिकांमध्ये राहून मदतीचा हात पुढे केला. त्यामुळे प्रभागातील नागरिकांकडून त्यांच्या या तत्परतेचे आणि सेवाभावी भूमिकेचे कौतुक होत आहे.
राजकारणापेक्षा जनसेवा महत्त्वाची, हीच भूमिका कृतीतून दाखवणाऱ्या अपूर्वा ताईंच्या प्रयत्नांना परिसरातून उत्स्फूर्त दाद मिळत आहे. प्रशासनाकडून पाणीपुरवठा पूर्ववत होण्यासाठी आणखी काही काळ लागणार असताना, तोपर्यंत नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागू नये, यासाठी टँकरद्वारे पाणी उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम दिलासा देणारा ठरत आहे. संकटाच्या काळात जनतेसोबत खंबीरपणे उभे राहणाऱ्या अपूर्वा ताई आणि जालूभाऊ चौधरी यांच्या या कार्याची प्रभागात चर्चा रंगली आहे.