करमाळा प्रतिनिधी (सागर गायकवाड) :- करमाळा शहरात नागपंचमीच्या सणाला ऐतिहासिक आणि मोठी परंपरा लाभली असून, या दिवशी शहरात मोठ्या उत्साहात पतंग उत्सव साजरा केला जातो. या पारंपरिक वारशाला कायम ठेवित, यंदाही किल्ला विभागातील लोकमान्य टिळक तरुण मंडळच्या वतीने नागपंचमीच्या निमित्ताने एका भव्य पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्याने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले.
लोकमान्य टिळक तरुण मंडळाचे माजी अध्यक्ष सौरभ उर्फ माऊली कदम यांच्या विशेष पुढाकाराने हा पतंग महोत्सव अत्यंत शिस्तबद्ध आणि दणदणीत वातावरणात पार पडला. आजच्या काळात सण-उत्सव साजरे करताना सार्वजनिक शिस्तीचे पालन कसे करावे, याचे उत्तम उदाहरण या तरुण मंडळाने घालून दिले आहे.
विशेष म्हणजे, महोत्सवादरम्यान युवकांनी आवाजाच्या मर्यादेचे काटेकोर पालन करत साउंड सिस्टीमवर नागरिकांना त्रास होणार नाही अशा प्रसन्न आणि चांगल्या दर्जाच्या गाण्यांवर ठेका धरला. किल्ल्यातील नागरिकांची कोणतीही गैरसोय किंवा विनाकारण कोणालाही त्रास न होऊ देता, पारंपरिक उत्साहात नृत्य करत आणि पतंग उडवत तरुणांनी नागपंचमीचा सण एका कौतुकास्पद पद्धतीने साजरा केला.
या पतंग महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी आणि उत्सवात सहभागासाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले. यामध्ये मंडळाचे माजी अध्यक्ष विशाल गायकवाड, अभिजीत सुरवसे, सागर गायकवाड, दिपक सुरवसे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी विरेंद्र लष्कर, गणेश शिंदे, अभिजीत कारंडे, विनायक तोडकर, कमलेश तोडकर, शिवराज तोडकर, साहिल पठाण, गौरव ननवरे, कुणाल ढाणे, आकाश सुरवसे, श्री पिंपळे, सर्वेश जाधव, रुद्र ननवरे, पप्पू मुसळे, अनिकेत रोकडे, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
करमाळा शहराच्या संस्कृतीला आणि परंपरेला जपत, कोणतीही अशोभनीय कृती न करता अत्यंत शिस्तप्रिय आणि आनंददायी वातावरणात पतंग महोत्सव साजरा केल्याबद्दल लोकमान्य टिळक तरुण मंडळ आणि सर्व तरुण कार्यकर्त्यांचे सर्व स्तरातून भरभरून कौतुक होत आहे.