न्यूज
ब्रेकिंग

ni “भिगवण पोलीस स्टेशनचा राष्ट्रीय सन्मान! पो.नि. सोमनाथ शेंडगे व पो.अं. सचिन पवार यांना केंद्रीय ‘उत्कृष्ट सेवा पदक'”

IMG-20260816-WA0693 देशभक्तीच्या जयघोषात लोकमान्य शिक्षण मंडळ संचालित ‘नवीन मराठी शाळेत’ तिरंगा रॅली उत्साहात संपन्न..

IMG-20260816-WA0690 पी.बी.ए. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन ध्वजवंदन करीत व राष्ट्रीय भक्ती गीत गायन स्पर्धा घेऊन उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात संपन्न

IMG-20260816-WA0687 श्रीमती द्रौ रा कन्या शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला…….

IMG-20260816-WA0673 ‘बाप एक अधिष्ठान’ विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात अमळनेर : प्रा. डॉ. एस. ओ. माळी परिवार, अमळनेर आणि यश पंढरी इंग्लिश क्लास यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. ओंकार त्र्यंबक माळी यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘बाप एक अधिष्ठान’ या विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निबंध स्पर्धेत एकूण २६ स्पर्धकांनी, तर वक्तृत्व स्पर्धेत १२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ५ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन गौरविण्यात आले. निबंध स्पर्धेत कु. लिना गणेश पाटील हिने प्रथम, कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने द्वितीय, तर कु. साक्षी अशोक बडगुजर हिने तृतीय क्रमांक पटकावला. वक्तृत्व स्पर्धेत कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने प्रथम, कु. गायत्री देविदास पाटील हिने द्वितीय, तर साहिल कैलास भिल याने तृतीय क्रमांक मिळविला. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रकाश पाटील, विजय पाटील, वासुदेव चौधरी, हेमांगी धर्माधिकारी आणि प्रा. स्वर्णदीप राजपूत यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांना आपल्या वक्तृत्व व लेखनातून ‘बाप’ या नात्याचे महत्त्व मांडण्याची संधी मिळाल्याने या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

शिरपूरात शहर व सांगवीत ग्रामीण अपर तहसील कार्यालयाचे विभाजन करावे महसुलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांचाकडे भाजपाचे अरुण धोबी यांची लेखी मागणी

अपनी भाषा में पढ़े! Translate

WhatsApp Image 2026-08-12 at 12.13.01 PM

शिरपूरात शहर व सांगवीत ग्रामीण अपर तहसील कार्यालयाचे विभाजन करावे महसुलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांचाकडे भाजपाचे अरुण धोबी यांची लेखी मागणी

शिरपुर : धुळे जिल्ह्यातील शिरपुर तालुक्यात प्रस्तावित अप्पर तहसिल कार्यालयाचे स्थान निक्षित करताना भौगोलिक, प्रशासकीय तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीचा सखोल विचार करून सदर कार्यालय सांगवी येथेच स्थापन करण्यात यावे यासाठी राज्याचे महसुलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्रालय मुंबईत दि. 11 ऑगस्ट 2026 रोजी धुळे भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी भेट घेवुन निवेदन देवुन मागणी केली आहे. तर याविषयी सविस्तर चर्चा हि करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की, धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्याचा झपाट्याने होणारा औद्योगिक विस्तार, वाढते नागरीकरण आणि साडेचार लाखांच्या पार गेलेली लोकसंख्या लक्षात घेता, प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी शासकीय अधिकारी यांचाकडुन शिरपुर तालुक्यात ‘अपर तहसील’ कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे. या पाठवलेल्या प्रस्तावामुळे शिरपूर तहसीलचे ‘शहर’ आणि ‘ग्रामीण’ अशा दोन स्वतंत्र विभागात विभाजन लवकरात लवकर करण्यात यावे. तर शिरपुर ग्रामीण तहसील कार्यालयाचे मुख्यालय सांगवी येथे करण्यात यावे. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेल्या शिरपूर तालुक्याची व्याप्ती मोठी आहे. २०११ च्या जनगणनेनुसार तालुक्याची लोकसंख्या ४ लाख २२ हजार होती, जी आता सुमारे ४.७० लाखांच्या घरात पोहोचली आहे. सद्यस्थितीत एकाच तहसील कार्यालयावर १३८ महसुली गावे, ६४ महसूल सजे आणि ११ मंडळांचा भार आहे. याशिवाय निवडणूक कामकाज, नैसर्गिक आपत्ती, शेतकरी विमा आणि विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीमुळे महसूल यंत्रणेवर मोठा ताण येतो. हा ताण कमी करून नागरिकांना जलद सेवा देण्यासाठी अपर तहसील कार्यालय लवकरात लवकर करण्यात यावे. अशी मागणी महसुलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांचाकडे धुळे भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी मागणी केली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे शिरपूर तालुक्यातील कामांना मोठी गती आगामी काळात मिळणार आहे. या प्रस्तावानुसार, प्रस्तावित अपर तहसील (शहर) कार्यालयांतर्गत ५४ महसुली गावे, २८ सजे आणि ५ महसूल मंडळांचा (शिरपूर, गिधाडे, करवंद, अर्थ, जवखेडा) समावेश असेल. दुसरीकडे, शिरपूर ग्रामीण सांगवी कार्यालयाकडे ८४ महसुली गावे, ३६ सजे आणि ६ महसूल मंडळांची (थाळनेर, होळनांथे, बोराडी, सांगवी, कोडीद, दहिवद) जबाबदारी राहील. ग्रामीण कार्यालयाचे मुख्यालय सांगवी येथेच करण्यात यावे. यासाठी धुळे भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी महसुलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांचाकडे सविस्तर निवेदन देवुन मागणी केली आहे. तर महसुलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवेदनाची तात्काऴ दखल घेत धुळे जिल्हाधिकारी यांना उचित कार्यवाई ताबडतोब करावी अशी सुचना केली आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, या नवीन रचनेमुळे आदिवासी भागातील नागरिकांना शासकीय सेवा वेळेत मिळणे सोपे होईल, संजय गांधी निराधार योजना, पीएम किसान सन्मान निधी आणि पुरवठा विभागाचे कामकाज अधिक गतिमान होईल. अपर तहसील कार्यालयासाठी २२ नियमित पदे मंजूर प्रस्तावित असून, यामुळे प्रशासकीय यंत्रणा अधिक बळकट होईल. शासनाकडून या प्रस्तावास हिरवा कंदील मिळाल्यास शिरपूरच्या विकासाला आणि प्रशासकीय पारदर्शकतेला मोठी चालना मिळणार आहे. तरी प्रस्तावित अपर तहसील कार्यालय शिरपुरात शहर व सांगवीत ग्रामिण लवकरात लवकर करण्यात यावे अशी मागणी धुळे भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी महसुलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेवुन निवेदन देवुन मागणी केली आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...

‘बाप एक अधिष्ठान’ विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात अमळनेर : प्रा. डॉ. एस. ओ. माळी परिवार, अमळनेर आणि यश पंढरी इंग्लिश क्लास यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. ओंकार त्र्यंबक माळी यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘बाप एक अधिष्ठान’ या विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निबंध स्पर्धेत एकूण २६ स्पर्धकांनी, तर वक्तृत्व स्पर्धेत १२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ५ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन गौरविण्यात आले. निबंध स्पर्धेत कु. लिना गणेश पाटील हिने प्रथम, कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने द्वितीय, तर कु. साक्षी अशोक बडगुजर हिने तृतीय क्रमांक पटकावला. वक्तृत्व स्पर्धेत कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने प्रथम, कु. गायत्री देविदास पाटील हिने द्वितीय, तर साहिल कैलास भिल याने तृतीय क्रमांक मिळविला. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रकाश पाटील, विजय पाटील, वासुदेव चौधरी, हेमांगी धर्माधिकारी आणि प्रा. स्वर्णदीप राजपूत यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांना आपल्या वक्तृत्व व लेखनातून ‘बाप’ या नात्याचे महत्त्व मांडण्याची संधी मिळाल्याने या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

error: Content is protected !!