शेतातील वहिवाटीचा रस्ता रोखणे अयोग्य; मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा महत्त्वाचा निर्णय.

अपनी भाषा में पढ़े! Translate

शेतातील वहिवाटीचा रस्ता रोखणे अयोग्य; मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा महत्त्वाचा निर्णय.

 

प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर 

शेतातील वहिवाटीचा रस्ता अडवणाऱ्या अर्जदारांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दणका दिला आहे. कोपरगाव दिवाणी न्यायालय आणि जिल्हा न्यायालयाचे आदेश कायम ठेवत, दौलत माधव भाकरे व इतरांचे अपील पूर्णपणे फेटाळून लावले आहे.

 

अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील जमिनीच्या वहिवाटीच्या रस्त्यावरून हा वाद निर्माण झाला होता. भास्कर वामन भाकरे व रावसाहेब वामन भाकरे हे गट क्रमांक ४४९ चे मालक व ताबेदार आहेत, तर अपीलकर्ते हे गट क्रमांक ४५० चे मालक आहेत. भास्कर भाकरे व रावसाहेब भाकरे यांनी त्यांच्या शेतात जाण्या-येण्यासाठी असलेल्या वहिवाटीच्या रस्त्यातील अडथळा दूर करण्यासाठी ॲड माधुरी काटे यांच्यामार्फत मामलेदार कोर्ट ॲक्ट, १९०६ च्या कलम ५(२) अन्वये तहसीलदार/मामलेदार यांच्याकडे ‘रस्ता केस दाखल केली होती. महसूल अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेची पाहणी करून पंचनामा, स्थळ पाहणी अहवाल आणि कच्चा नकाशा तयार केला. यामध्ये दोन्ही गटांच्या सरहद्दीवरून रस्ता जात असल्याचे निष्पन्न झाल्याने तहसीलदारांनी २० जानेवारी २०२५ रोजी रस्ता मोकळा करून अडथळा दूर करण्याचा आदेश दिलेला होता. तहसीलदारांच्या आदेशाविरोधात अपीलकर्त्यांनी दाखल केलेला फेरविचार अर्ज उपविभागीय अधिकारी, शिर्डी यांनी ३० मे २०२५ रोजी फेटाळून लावला. यानंतर अपीलकर्त्यांनी नियमित दिवाणी दावा दाखल करून तात्पुरत्या मनाई हुकूमासाठी अर्ज केला, परंतु दिवाणी न्यायालयाने तसेच

जिल्हा न्यायाधीश-१, कोपरगाव यांनी प्रतिवादी यांच्या वतीने ॲड माधुरी काटे यांचा प्रभावी युक्तिवाद ग्राह्य धरून, मनाई हुकूमचे अर्ज फेटाळून लावले. सदरील आदेशा विरुद्ध अपीलकर्त्यांनी औरंगाबाद खंडपीठात दाद मागितली होती. भास्कर भाकरे यांच्या तर्फे ॲड. निलेश एन. भागवत यांनी युक्तिवाद करून महसूल पंचनामा, गुगल मॅप्सचे फोटो आणि मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे कायदेशीर दाखले सादर करत रस्त्याचे अस्तित्व सिद्ध केले. गावच्या नकाशात अथवा महसुली नोंद नसली तरी रूढी-परंपरेने वापरला जाणारा रस्ता अस्तित्वात असू शकतो, तसेच पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याचे माननीय न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

मा. न्यायमूर्ती संजय ए. देशमुख यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून स्पष्ट केले की, अपीलकर्त्यांनी दिवाणी दाव्यात प्रतिवादींकडे पर्यायी रस्ता असल्याचा कोणताही स्पष्ट पुरावा किंवा मांडणी केलेली नाही. मामलेदार कोर्ट ॲक्टनुसार शेतकऱ्यांच्या शेतातील रस्त्याचे रक्षण करणे आवश्यक आहे. खालच्या दोन्ही न्यायालयांनी दिलेले निष्कर्ष कायदेशीर व योग्य असल्याने उच्च न्यायालयाने दौलत माधव भाकरे व इतरांचे अपील फेटाळून लावले.

सदरील प्रकरणी प्रतिवादींच्या वतीने ॲड निलेश भागवत व ॲड माधुरी काटे यांनी काम पाहिले.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...

‘बाप एक अधिष्ठान’ विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा उत्साहात अमळनेर : प्रा. डॉ. एस. ओ. माळी परिवार, अमळनेर आणि यश पंढरी इंग्लिश क्लास यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. ओंकार त्र्यंबक माळी यांच्या २६ व्या पुण्यतिथीनिमित्त ‘बाप एक अधिष्ठान’ या विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. निबंध स्पर्धेत एकूण २६ स्पर्धकांनी, तर वक्तृत्व स्पर्धेत १२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना एकूण ५ हजार रुपयांची रोख बक्षिसे देण्यात आली. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व मोमेंटो देऊन गौरविण्यात आले. निबंध स्पर्धेत कु. लिना गणेश पाटील हिने प्रथम, कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने द्वितीय, तर कु. साक्षी अशोक बडगुजर हिने तृतीय क्रमांक पटकावला. वक्तृत्व स्पर्धेत कु. प्रेरणा वासुदेव चौधरी हिने प्रथम, कु. गायत्री देविदास पाटील हिने द्वितीय, तर साहिल कैलास भिल याने तृतीय क्रमांक मिळविला. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रा. प्रकाश पाटील, विजय पाटील, वासुदेव चौधरी, हेमांगी धर्माधिकारी आणि प्रा. स्वर्णदीप राजपूत यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांना आपल्या वक्तृत्व व लेखनातून ‘बाप’ या नात्याचे महत्त्व मांडण्याची संधी मिळाल्याने या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.

error: Content is protected !!