ओबीसीचे राजकीय आरक्षण पूर्ववत झाल्याशिवाय निवडणूका घेवु नयेत- मागणी
शिरपूर : सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे ओबीसी वर्गाचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण स्थगित झालेले आहे. यापूर्वी १०५ नगरपंचायत व अकोला, वाशिम, भंडारा, पालघर, नंदुरबार व नागपूर या जिल्हा परिषद मधील पोटनिवडणूक काही ओबीसी आरक्षणाशिवाय झाल्यामुळे या प्रवर्गावर अन्याय झाला आहे. घटनेच्या ७३ व्या व ७४ व्या घटना दुरुस्तीने आरक्षण मिळाले होते. तरीही कोर्टात योग्य मांडणी केंद्र व राज्य या दोन्ही सरकारकडून झाली नाही. यापुढील स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय ओबीसी आरक्षण पूर्ववत झाल्याशिवाय निवडणूका होऊ नयेत. ओबीसी समाजाची तीव्र भावना राज्य व केंद्र सरकारला कळवावी व ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल. असे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात अले आहे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचा वतीने अप्पर जिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना बारा बलुतेदार महासंघ उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्याध्यक्ष एकनाथराव बोरसे यांचा नेतृत्वाखाली (दि.७ मार्च) रोजी धुळे येथे देण्यात आले. निवेदनाची प्रत ना. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र यांना ही पाठवण्यात आले आहे. अप्पर जिल्हाधिकारी संजय गायकवाड यांना निवेदन देतेवेळी बारा बलुतेदार महासंघ धुळे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश गुरव, धुळे जिल्हा बारा बलुतेदार महासंघ प्रमुख सल्लागार अरुण धोबी, शिरपूर बारा बलुतेदार महासंघ तालुकाध्यक्ष योगीराज बोरसे, शिरपूर बारा बलुतेदार महासंघ शहराध्यक्ष रमेश चौधरी उपस्थित होते. निवेदनात पुढे म्हटले आहे की, ओबीसीच्या राजकीय आरक्षणा शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ नये, बारा बलुतेदार समाजाच्या आर्थिक विकासासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ निर्माण करणे, एसबीसी समाजाचे आरक्षण ५० % च्या आत बसवणे व महाज्योती या संस्थेला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा अश्या विविध मागण्याचे निवेदन बारा बलुतेदार महासंघ उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्याध्यक्ष एकनाथराव बोरसे, बारा बलुतेदार महासंघ धुळे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश गुरव, जिल्हा बारा बलुतेदार महासंघ प्रमुख सल्लागार अरुण धोबी, शिरपूर बारा बलुतेदार महासंघ तालुकाध्यक्ष योगीराज बोरसे, शिरपूर बारा बलुतेदार महासंघ शहराध्यक्ष रमेश चौधरी यांचा शिष्टमंडळाने धुळे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना दिले आहे. निवेदनावर सुभाष लोहार, सुनिल चौधरी, रविंद्र भोई, राधेश्याम भोई, मनोज भावसार, संजय आसापुरे, अर्जुन चौधरी, एम. के. भामरे, ईश्वरलाल शिरसाठ, अभिजीत शिंपी, गिरीष कुंभार, अविनाश शिंपी, भरत धनगर आदिंच्या सह्या आहेत.