खेडच्या खुशी नलगे ने राज्यस्तरीय तिरंदाजी स्पर्धेत पटकावला द्वितीय क्रमांक
प्रतिनिधी.संदिप कायगुडे
कर्जत – अहमदनगर जिल्ह्यातील व कर्जत तालुक्यातील खेड केंद्रातील लोकनायक जयप्रकाश नारायण माध्यमिक विद्यालय खेड येथील इयत्ता पाचवीमधील विलास नलगे हिने राज्यस्तरीय
तिरंदाजी (Archery) स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या विद्यार्थिनीची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राजरत्न सुधाकर गाडे यांनी तिरंदाजी (Archery) स्पर्धेसाठी सराव घेतला असून विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रकांत चेडे, वर्गशिक्षक कांबळे सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. स्पर्धेसाठी केंद्राचे क्रीडा शिक्षक विनोद देशमुख यांनी स्पर्धेची सर्व जबाबदारी पार पाडली. गटविकास अधिकारी अमोल जाधव, शिक्षणाधिकारी श्रीमती शिवगुंडे, राशीन बीटच्या विस्ताराधिकारी श्रीमती निंबाळकर यांच्याकडून प्रेरणा मिळाली आहे. युवक क्रांती दलाचे कमलाकर शेटे यांचे अनमोल सहकार्य लाभले.
या निवडीबद्दल गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, सरपंच, शाळाव्यवस्थापन समिती, ग्रामस्थ यांनी अभिनंदन व कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.
‘ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये चांगले कौशल्य आहे. या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आणि दिशा मिळाल्यास देशात आणि जगात नाव रोशन करतील. अभ्यासाबरोबरच क्रिडा क्षेत्रात करिअर करण्यासाठी सर्वांनी प्रोत्साहन देण्याची गरज आहे. या विद्यार्थिनीनी तिरंदाजी स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावल्याबद्दल तालुक्यासाठी आनंदाची बाब आहे. मी युक्रांदच्या वतीने स्पर्धेसाठी मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानतो तसेच खुशीच्या पालकांचे सुध्दा आभार मानत सर्वच पालकांनी आपल्या पाल्यांसाठी क्रीडा क्षेत्रातील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.’