June 29, 2025 4:45 am

तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार

अपनी भाषा में पढ़े! Translate

तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार

जळगाव व उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्याला 5.78 लाख एकर सिंचनलाभ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

मार्मिक न्यूज नेटवर्क : विक्की जाधव 

तापी मेगा रिचार्ज प्रकल्पासाठी महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांनी आज ऐतिहासिक सामंजस्य करार केला. या प्रकल्पामुळे जळगाव, अकोला, बुलढाणा, अमरावती यांसारख्या उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील भागांतील खारपाण पट्ट्यात मोठ्या प्रमाणात सिंचनसुविधा उपलब्ध होणार असून, शेतकऱ्यांच्या आयुष्यात सकारात्मक क्रांती होण्याची अपेक्षा आहे.

या प्रकल्पाच्या अंतर्गत मध्यप्रदेशातील खरिया गुटी घाट येथे तापी नदीवर मोठे धरण उभारण्यात येणार आहे. एकूण 3.57 लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून, त्यापैकी 2.34 लाख हेक्टर महाराष्ट्रातील आणि 1.23 लाख हेक्टर मध्यप्रदेशातील आहे. महाराष्ट्रातील एकूण पाणीवापर 19.37 टीएमसी इतका असेल तर मध्यप्रदेशाचा वाटा 11.76 टीएमसी इतका राहणार आहे. संपूर्ण प्रकल्पाची अंदाजे किंमत 19,244 कोटी रुपये (2022-23 चे दर) इतकी आहे.

या ऐतिहासिक बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, तुलसीराम सिलावट, कुंवर विजय शाह तसेच दोन्ही राज्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “या प्रकल्पामुळे ज्या भागात पाण्याची कमतरता आणि खारटपणा आहे, त्या भागात पिण्याचे पाणी आणि सिंचनाच्या सुविधा मिळणार आहेत. त्यामुळे शेतकरी सुखी होतील, शेतीचे उत्पादन वाढेल आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. हा प्रकल्प म्हणजे फक्त सिंचन नव्हे, तर ग्रामीण विकासाचा मार्ग आहे.”

ते पुढे म्हणाले की, “तापी मेगा रिचार्ज हे एक जागतिक स्तरावर लक्ष वेधून घेणारे उदाहरण ठरेल. यासाठी आम्ही केंद्र सरकारकडे ‘केंद्रीय योजना’ म्हणून मान्यता मागणार आहोत.”

जुने प्रलंबित प्रकल्पही मार्गी

या बैठकीत महाराष्ट्राच्या काही जुन्या प्रलंबित प्रकल्पांवरही चर्चा झाली. त्यात डांगुर्ली बॅरेज आणि जामघाट प्रकल्प यांचा समावेश होता. विशेषतः जामघाट प्रकल्पामुळे नागपूर शहराला पुढील 30-40 वर्षांसाठी पाण्याचा स्थिर पुरवठा सुनिश्चित होईल, अशी माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

पुढील बैठक ऑक्टोबरमध्ये

या प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत दोन्ही राज्यांमध्ये पुन्हा ऑक्टोबर 2025 मध्ये बैठक होणार असून, एकत्रित काम करण्याच्या शक्यतांवरही विचार केला जाईल.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!