नंदुरबार भाजपाच्या अंतर्गत गटबाजीचा राजकारणाने सामान्य कार्यकर्ते हैरान विजय चौधरी आणि निलेश माळी यांच्यावर कार्यकर्त्यांचा नाराजीचा सुड
नंदुरबार (२८ एप्रिल २०२५) –
काल नंदुरबारमध्ये भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष निवडीसाठी प्रदेश निरीक्षक आले – मा. भारतीताई पवार आणि खा. स्मिताताई वाघ यांच्या उपस्थितीत ही गुप्त बैठक पार पडली. मात्र, या बैठकीची माहिती ९०% कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचू दिली नाही, हे वास्तव अधिक धक्कादायक आहे.
“ही निवड होती का कट?”
भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र रमेश गावित यांनी थेट प्रश्न उपस्थित केला – “गेल्या ३-४ वर्षांत पक्षासाठी काय दिवे लावले प्रस्थापितांनी? दुसऱ्या पक्षातून येऊन चमचागिरीचा आधार घेऊन गटबाजी करणाऱ्या या लोकांनी कार्यकर्त्यांची तोंडं बंद ठेवायला सुरुवात केली आहे.” यात विजय चौधरी आणि जिल्हा अध्यक्ष निलेश माळी यांची नावे समोर येत आहेत. तर जिल्ह्यात पक्षांतर्गत राजकारण करण्याऱ्या जिल्हाध्यक्ष यांचेवर कार्यकर्त्याचां नाराजीचां सुरु ओढवत आहेत. त्यांना लवकरात लवकर पदमुक्त करारण्यासाठी, सामान्यांकार्यकर्त्यास न्यायमिळण्यासाठी मा. रविंद्रजी चव्हाण साहेबांना पत्र लिहले आहे
गावित पुढे म्हणाले –
“मी राजू गावित – सावरटवाला – संघर्ष माझ्या रकतात आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संपवण्याचा प्रयत्न करणारे स्वतःच नष्ट होतील. कारण आमची नाळ सत्यची आहे. जेव्हा पक्षाच्या संघर्षाच्या काळात आम्ही संघर्ष केला तर आता आमचा संघर्ष पक्ष वाचवण्यासाठी चार पटीने असेल. तर सद्याचे जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष नसून चपरासी आहेत असाही आरोप त्यांनी केला.
“कार्यालय का वाटतं घर?”
गावितांनी विजय पर्व या भाजपाच्या तथाकथित कार्यालयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं –
“हा पक्षाचा कार्यालय आहे की काही लोकांचा खाजगी अड्डा? हा प्रश्न फक्त माझा नाही – तो संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा आहे.”
त्यांनी प्रदेश नेते मा. रविंद्रजी चव्हाण साहेबांना थेट मागणी केली –
“हे कार्यालय खाजगी घरावरून हलवण्यात यावं – तोपर्यंत नंदुरबारमधील ९०% कार्यकर्त्यांना न्याय मिळणार नाही.”
“भाजपात आता परिवर्तनाची गरज आहे – संघर्ष करणाऱ्यांनाच जागा मिळायला हवी!”
– राजेंद्र रमेश गावित, जिल्हा उपाध्यक्ष, भाजपा नंदुरबार