June 29, 2025 3:32 pm

ग्रामसुरक्षा दलाचे कार्य पोलिसांच्या दृष्टीने महत्त्वाचे;वालचंद नगर पोलीस स्टेशन यांचे वतीने ग्राम सुरक्षा दल मेळावा आयोजित

अपनी भाषा में पढ़े! Translate

ग्रामसुरक्षा दलाचे कार्य पोलिसांच्या दृष्टीने महत्त्वाचे;वालचंद नगर पोलीस स्टेशन यांचे वतीने ग्राम सुरक्षा दल मेळावा आयोजित

(निलेश गायकवाड)

शनिवार दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी ६ वाजता भव्य ग्राम सुरक्षा दल मेळावा आयोजित केला होता वालचंद नगर पोलीस स्टेशन अंतर्गत 39 गावे १३ वाड्या वस्त्या असे एकूण 52 गावांमधील ग्रामसुरक्षा दल सदस्य 233 जवानांची गाव पातळीवर निवड करून त्यांना श्री गणेश बिरादार सो अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग तसेच डॉक्टर श्री सुदर्शन राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग यांचे हस्ते ग्रामसुरक्षा दलातील सदस्य यांना ड्रेस लाठी शिट्टी या साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच 39 गावांमधील पोलीस पाटील या पैकी काही पोलीस पाटलांनी विशेष कामगिरी केलेली आहे त्यांना वालचंद नगर पोलीस स्टेशन कडून सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला पोलीस पाटील श्री मारुती दत्तू रासकर राहणार निर्वांगी श्री विलास परब कणसे मानकरवाडी राजू गायकवाड चिखली सागर खरात तावशी सौ उषा वाघमोडे शेळगाव पिनाली गायकवाड कर्दनवाडी सौ रेश्मा प्रशांत नवसे जाचकवस्ती तसेच संदीप चिंचकर रणगांव पोलीस पाटील कळंब गावचे पोलीस पाटील करडे यांचा सत्कार करण्यात आला तसेच प्रत्येक गावांमधील महिला दक्षता कमिटी स्थापन केल्याने काही महिलांच्या सामाजिक अडीअडचणी सोडवण्यासाठी विशेष कामगिरी केली आहे त्या महिलांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला आहे सौ अश्विनी गणेश जाधव अध्यक्ष सौ राणी अमोल थोरात सौ मयुरी शरद जामदार बेलवाडी सौ सोनाली महेश निंबाळकर गीतांजली पाटोळे सौ योगिता जामदार जाचक वस्ती यांचाही सत्कार करण्यात आला आहे या वेळी रतिलाल चौधर पोलीस उपनिरीक्षक यांनी प्रास्ताविक केले त्यानंतर ॲडव्होकेट सुप्रिया बर्गे यांनी मनोगत व्यक्त केले त्यानंतर डॉक्टर श्री सुदर्शन राठोड म्हणाले की ग्राम सुरक्षा दलाचे कार्य पोलिसांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे सामाजिक बांधिलकीची भावना ठेवून अधिक अधिक युवकांनी ग्रामसुरक्षा दलात सहभागी व्हावे पोलिसांचे संख्या बळ विचारात घेता पोलीस सर्वच ठिकाणी जाऊ शकतील असे नाही त्यामुळे मदतीसाठी ग्रामसुरक्षा दलातील जवान असणे गरजेचे बनले आहे ग्रामसुरक्षा दलातील जवानांनी चांगले काम केले तर पोलीस स्टेशन कडून सन्मान होत असतो त्याचा फायदा पोलीस भरतीसाठी होत असतो आपल्याला एक शिस्त वेगळीच लागते त्यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक श्री गणेश बिरादार म्हणाले की ग्राम सुरक्षा दलातील सदस्यांना प्रशिक्षण द्या म्हणजे कसे बोलावे कसे राहावे ड्रेस ला ठी शिट्टी चा वापर चांगल्या कामासाठी करा रात्रगस्त पालखी सोहळा गणपती बंदोबस्त गावची जत्रा या ठिकाणी आपण पोलिसांना मदत करावी गावामध्ये बाहेरून येणारी वाहने संशयित व्यक्ती यांची विचारपूस केली पाहिजे काही संशयत दिसल्यास पोलिसांना तात्काळ फोन करून माहिती सांगितली पाहिजे आपण रात्रगस्त सतर्कपणे करत जावा आपण सतर्क ड्युटी केली तर चोरांचे प्रमाण गरफोडीचे प्रमाण होणार नाही तसेच ज्या ग्रामसुरक्षा दलातील जवान यांनी विशेष कामगिरी केली की त्यांचा सन्मान पोलीस स्टेशन येथे केला जाईल तसेच ग्राम सुरक्षा दलामध्ये कर्तव्य बजावत असताना जे युवक यांना पोलीस भरती सैनिक भरती व इतर शासकीय नोकरीसाठी फायदा होईल असेही सांगितले यावेळी प्रस्ताविक रतिलाल चौधर पोलीस उपनिरीक्षक यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री राजकुमार डुणगे सहाय्यक पोलीस निरीक्षक वालचंद नगर पोलीस स्टेशन यांनी मांडले यावेळी मिलिंद मिठ्ठा पल्ली पोलीस उपनिरीक्षक विजय टेळकीकर पोलीस स्टाफ ग्रामसुरक्षा दलातील सदस्य महिला दक्षता समिती पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होता.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!