फूड स्टॉल धारकांना परवाना बंधनकारक; अन्यथा होणार कारवाई..
अमळनेर: विक्की जाधव.
अन्न सुरक्षा व मानके कायद्याअंतर्गत अन्न व्यवसाय करणाऱ्या आस्थापनांना अन्न परवाना किंवा नोंदणी करणे अनिवार्य असल्याचे जळगाव कार्यालयाचे सहायक आयुक्त (अन्न) सं. कृ. कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील अन्न व्यावसायिकांनी परवाना किंवा नोंदणी घेऊनच अन्न विक्रीचा व्यवसाय करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.विनापरवाना अन्न व्यवसाय करणे कायद्यानुसार गुन्हा ठरते. असा व्यवसाय केल्यास 10 लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व अन्न व्यावसायिकांनी कायदेशीर करवाई टाळण्यासाठीच परवाना किंवा नोंदणी करणे आवश्यक आहे.
लेखित केलेल्या निर्देशानुसार, ज्या अन्न व्यावसायिकांकडे असलेल्या परवान्याची मुदत संपण्यापूर्वी ऑनलाईन नूतनीकरण करणे आवश्यक आहे. अन्यथा, 6000 रुपयांचा दंड भरावा लागेल. मुदत संपल्यानंतर परवाना रद्द होईल, ज्यामुळे संबंधित व्यवसाय विनापरवाना ठरवला जाईल आणि त्याच्यावर कायदेशीर दंडात्मक कारवाई केली जाईल.
अन्न परवाना व नोंदणीसाठी अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण यांची [https://foscos.fesai.gov.in](https://foscos.fesai.gov.in) या संकेतस्थळावर ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे.
विशेषतः, ज्यांची वार्षिक उलाढाल 12 लाखांच्या आत आहे त्यांनी अन्न नोंदणी करणे आवश्यक आहे, तर ज्यांची वार्षिक उलाढाल 12 लाख किंवा त्यापेक्षा अधिक आहे, त्यांनी अन्न परवान्यासाठी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अन्न सुरक्षा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे अन्न व्यावसायिकांनी अन्न परवाना आणि नोंदणीकडे लक्ष द्यावे आणि कायद्याचे पालन करण्याची गरज आहे.