महाराष्ट्र नव्हे,तर देशासमोर एक आदर्श सत्यशोधक विचारवंत कर्मवीर आण्णाबाबा….
आपल्या तालुक्याचा शैक्षणिक व सामाजिक क्षेत्राचा पाया रचियेते कर्मवीर आण्णाबाबा हेच आपले खरेखुरे भाग्यविधाते!
बाबांनी,तालुक्यात फुले-शाहु-आंबेडकरांचा विचारांचा वारसा जपत गोरगरीबांच्या घरापर्यंत खऱ्याखुऱ्या अर्थाने शिक्षणाची गंगोत्री नेली, गोरगरीबांच्या मुलांसाठी अन्नछत्र व छात्रालय उभी केलीत म्हणूनच या तालुक्यातील दलित,आदिवासी,शेतमजूर, कामगार कष्टकरींचा मसिहा आण्णा बाबा हेच या तालुक्याचे खरेखुरे भाग्यविधाते!
आपल्या शैक्षणिक संस्थेचा वटवृक्षाची पायाभरणी करताना ‘बहुजन हिताय व बहुजन सुखाय’ हा सिद्धांत समोर ठेवला.तालुक्याचा विकासाचा पाया भरणी करताना शिक्षणास सर्वप्रथम प्राधान्य दिले त्यातच त्यांनी फुले-शाहु-आबेंडकरांचा शैक्षणिक व सामाजिक सिद्धांत प्रत्यक्ष कृतीत रुजवला.
सामाजिक क्षेत्रात आमुलाग्र बदल घडावा यासाठी त्यांनी समाजासमोर एक आदर्श ठेवला,तो म्हणजे सत्यशोधक विचारांचा वारसा सोबत घेत आपल्या शैक्षणिक संस्थेतील विद्यलयांना थोर साहित्यिक विचारवंत,समाज सुधारक,राष्ट्रनर्माते आणि तालुक्यातील सामाजिक उदार दातृत्वाचा भाव जोपासणारे दाते यांची नावे देत महाराष्ट्रासमोर नव्हे तर देशासमोर आण्णा बाबा एक आदर्श आहेत.अशा थोर महानायकास आजच्या स्मृतीदिनी स्मरण करत, त्यांच्या स्मृतीना उजाळा देत तालुक्यातील तमाम जनतेकडून त्यांच्या आदर्श स्मृतीना कोटी कोटी विनम्रपणे अभिवादन…
जय ज्योती!जय क्रांती! जयभीम! जय सत्यशोधक आण्णाबाबा…