निवडणूक काळात उत्कृष्ट काम केल्याबद्दल पोलीस प्रशासनातर्फे पोलीस हेडकॉन्स्टेबल नरेंद्र वारुळे याचा प्रशंसापत्र देऊन गौरव..
नुकतीच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या असून पोलीस फोर्स आणि कर्मचाऱ्यांशिवाय निवडणुका घेणे अशक्यच होय.
अमळनेर : विक्की जाधव
नुकतीच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या असून पोलीस फोर्स आणि कर्मचाऱ्यांशिवाय निवडणुका घेणे अशक्यच होय. यासंदर्भात पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी आणि पोलीस ऑब्झर्व्हर तौहीद परवेज यांनी निवडणूक काळात उत्कृष्ट काम केल्याबद्दल पोलीस प्रशासनातर्फे पोलीस हेडकॉन्स्टेबल नरेंद्र वारुळे याचा प्रशंसापत्र देऊन गौरव करण्यात आला. नुकतीच विधानसभा निवडणुकीत जिल्हा घटकांची वरिष्ठांना लागणारी माहिती तयार करणे , कामकाजात अहोरात्र समर्पण व कठोर परिश्रम घेतल्याने निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. म्हणून पोलीस अधीक्षक रेड्डी आणि पोलीस ऑब्झर्व्हर तौहीद परवेज यांनी प्रशंसा पत्र देऊन वारुळे यांचा गौरव केला असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.