June 29, 2025 12:28 pm

अपनी भाषा में पढ़े! Translate

मा. आ. शिरीष चौधरी यांच्या अमळनेर शहरात झालेल्या प्रचार रॅलीदरम्यान शहरांतील जाणसामान्य जनतेकडून उत्सपूर्त प्रतिसाद

 

अमळनेर : विक्की जाधव

अमळनेर शहरात माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी आणि त्यांचे बंधू रवींद्र बापू चौधरी यांना प्रचार रॅली दरम्यान नागरिकांकडून मिळतोय उत्साही प्रतिसाद स्थानिक जनतेच्या समस्या निराधार राहिलेल्या नाहीत.

रॅलीत उपस्थित शेतकरी, व्यापारी, कष्टकरी आणि तरुणांनी विविध समस्यांवर चर्चा करून त्यांच्या अपेक्षा व्यक्त केल्या, ज्यात गुंडागिरी, दुष्काळ, आणि पिक विमा यांचा समावेश आहे. अमळनेर शहरात गेल्या पाच वर्षांत गुंडागिरीच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या गुंडागिरीमुळे सामान्य माणसाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे, अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या पीक लागवडीचा विमा कोणत्याही कारणाशिवाय नाकारल्याने त्यांचे आर्थिक भविष्य धोक्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मनातील असंतोष वाढत चालला आहे. याबाबत ह्यां विधानसभेत जनतेने मागणी केली आहे की, शेतकऱ्यांच्या हक्कांप्रति जागरूकता निर्माण करणारा जनसेवक म्हणून शिरीष चौधरी यांना निवडून देने अत्यावश्यक आहे.

 

अनिल पाटील यांच्यावर नाराजी..

माजी मंत्री अनिल पाटील यांच्या नेतृत्वात मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांचे, व्यापाऱ्यांचे, आणि तरुणांचे प्रश्‍न अनुत्तरीत राहिले आहेत. तालुक्याचा पाहिजे तसा विकास झाला नाही त्यांच्या कार्यशैलीविषयी असंतोष व्यक्त करताना, जनतेने स्पष्टपणे शिरीष चौधरी यांना पाठिंबा दर्शवला आहे.

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

ताज्या बातम्या आपल्या मोबाइल मध्ये मिळवण्यासाठी आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा!

शेअर करा

आपल्या व्यवसायाची जाहिरात येथे दाखवण्यासाठी संपर्क करा.. 

8390060083

मागील..
हे ही वाचा...
error: Content is protected !!