पत्रकारांच्या व्यथा जाणून घेतल्या पाहिजेत राज्य पत्रकार संघाध्यक्ष वसंत मुंडे यांचे प्रतिपादन.
अमळनेर : विक्की जाधव.
पत्रकाराच्या आत डोकावित, त्याच्या व्यथा सुद्धा समाजाने जाणून घेत, त्याला मदतीचा हात दिला पाहिजे, असे प्रतिपादन राज्य पत्रकार संघाध्यक्ष वसंत मुंडे यांनी दीक्षाभूमी ते मंत्रालय अशी लोकशाहीच्या बळकटीसाठी आणि पत्रकारांच्या हक्कासाठी संवाद यात्रा काढली आहे. या यात्रेचे गुरुवारी अमळनेरात आगमन झाले. तर साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाला मान्यवरांनी यावेळी अभिवादन केले. पैलाड भागातून शहरात येतांना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला विनम्र अभिवादन करुन शहरात झाला प्रवेश तर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे, खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा, उपाध्यक्ष भुवनेश दुसाने तसेच तालुकाध्यक्ष समाधान मैराळे तसेच मान्यवरांत डॉ.अनिल शिंदे, तिलोत्तमाताई आदि उपस्थित होते.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष, भडगावचे स्व.प्रमोद सोनवणे यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या कुटुंबियांना विम्याचे १० लाख रु. मिळाल्याचे अध्यक्षांनी सांगितले. त्याचप्रमाणे स्थानिक पत्रकार संघातर्फे या यात्रेला ५ हजाराचा निधी देण्यात आला. अतिथींच्याहस्ते मतिमंद विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
प्रास्ताविक प्रा.डॉ.विजय गाढे तर सूत्रसंचलन यदुवीर पाटील यांनी केले.