मदनवाडी येथे कृषिमित्र ॲग्री मॉलला स्पेन व जर्मन पाहुण्यांनी दिली भेट;Geolife कंपनीचे खात्रीशीर शेतकऱ्यांना माहिती
भिगवण (निलेश गायकवाड)
हरितक्रांतीमुळे देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला असला, तरी शेतात अमर्यादित रासायनिक खतांच्या वापरामुळे लोकांची आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. वेगाने वाढणार्या कर्करोगामागेही रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर हे कारण असल्याचे समोर आले आहे.शेतीचा कस राखण्यासाठी आणि अधिकाधिक उत्पादनासाठी शेतात मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करण्यावर भर दिला जात आहे. शेतातील मृदा परीक्षण न करताच आपल्या मनाप्रमाणे खतांचा भडिमार केला जात आहे.याच कारणामुळे मुंबई येथील विनोद लाहोटी चेअरमन Geolife India Ltd mumbai या कंपनीने नुकतेच मदनवाडी येथील कृषिमित्र ॲग्री मॉल ला भेट देत ज्योर्डी फ्लूग, स्पेन व ख्रिस जर्मन या प्रमुख पाहुण्यांनी येऊन शेतकरी व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना माहिती देताना सांगितले रासायनिक खतांमुळे शेती उत्पादनात भरघोस वाढ झाली आहे, हे वास्तव आहे; परंतु त्याच वेळी शेतजमिनींबरोबरच भवतालच्या पर्यावरणावर याचा प्रतिकूल परिणाम दिसून येत आहे. रासायनिक खतांच्या मार्यामुळे मातीचा कस कमालीचा खालावतो आहे. तसेच माती क्षारयुक्त होत आहे. अशी माती पीक उत्पादन घेण्याच्या क्षमतेची राहात नाही. त्यामुळे वर्षांनुवर्षे रासानिक खतांचा वापर केल्या जाणार्या काही शेतांमधून उत्पादनात लक्षणीय घट होत असल्याच्या तक्रारीसुद्धा यायला सुरुवात झाली आहे. एवढेच नव्हे तर युरिया आणि डीएपीसारख्या खतांचा अधिकाधिक वापर केल्यामुळे मातीतील नैसर्गिक तत्त्वे लोप पावत आहेत. त्यामुळे मातीच्या कणांमध्ये पाणी साठवून ठेवण्याची क्षमता कमी झाली आहे. रासायनिक खतांमुळे होणार्या नुकसानीचा विचार करता जलमार्ग प्रदूषण, अधिक रासायनिक खतांच्या वाढत्या प्रमाणामुळे Geolife कंपनीने आपले दावे ग्यारंटी समवेत देत स्थानीक ग्रामस्थांना दिलेले प्रॉडक्ट या हे खात्रीशीर माहिती घेत मिळालेले उत्पन्न आणि result महत्वपूर्ण असल्याचे दिसून आले.तसेच या मधून कोणताही परिणाम शेतीवर व उत्पनावर होणार नसल्याचे सांगितले.
यामध्ये स्थानिक शेतकरी
1- प्रथमेश दादा मोहिते गुजरात रेड पेरू – पारेवाडी
2- श्री . मारुती कोकरे – केळी – खादगाव
3- श्री. नवनाथ कोकरे- पपई खादगाव
4- श्री.विजय कोकरे- केळी – खादगांव
5- श्री. विनोद बाबर – केळी – हिंगणी
येथील शेतकऱ्यांनी घेतलेले पीक व त्यांनी घेतलेले प्रॉडक्ट व भेटलेला result याची माहिती पाहुण्यांना दिली व मार्गदर्शन केले.
कृषिमित्र ॲग्री मॉल चे सौ. अस्मिता पवार व श्री रणजित पवार यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.