पोलीस भरतीसाठी मुंबई येथे गेलेल्या अमळनेरच्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
अमळनेर : विक्की जाधव.
याबाबत अधिक माहिती अशी की,
अमळनेर येथील प्रबुद्ध कॉलनीतील रहिवासी अक्षय मिलिंद बिऱ्हाडे तरुण मुंबईत येथे पोलीस भरतीसाठी गेला होता. मैदानी चाचणी असल्याने तो मैदानात धावत असताना असताना अचानक चक्कर येऊन तो खाली पडला अन बेशुद्ध झाल्याने त्याला तातडीने उचलून जवळच असलेल्या कळवा येथे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. दोन तासांनी तो शुद्धीवर आला मात्र नियतीस हे मान्य न होते, पुन्हा त्याला हृदयाचा झटका आल्याने उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. या दुःखद घटनेने पोलीस भर्ती करणाऱ्या विद्यार्थी आणि त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून नियतीने आईवडिलांचा एकुलता एक आधार हिरावून नेला आहे. अनेक वर्षांपासून पोलिसांत भरती होण्याचे स्वप्न पाहुन प्रचंड मेहनत तो घेत होता. या वेळी भरती होणारच अशी जिद्द त्याची होती.
अमळनेर तहसील कार्यालय समोर नातेवाईकांनी प्रशासनासं घेरले.
अमळनेर तहसील आवारात विद्यार्थ्यांनी नातेवाईकांनी अक्षय बिरडे याच्या मृत्यांस जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल व्हावा म्हणून तहसीलदार यांच्या दालनासमोर आंदोलन करून कारवाईची केली मागणी