रास्त भाव दुकानदारांचे एक दिवसांचे लाक्षणिक उपोषण तहसीलदारांना दिले निवेदन..
अमळनेर : विक्की जाधव.
शहरात रेशन दुकानदारांनी एक दिवसाचे लक्षणे उपोषण करून तहसीलदार यांना देणे निवेदन दिले सदर दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, अनेक वर्षापासून स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवाना धारकांच्या मागण्या, अडचणी व समस्यांची सोडवणूक करण्याकरीता महाराष्ट्र राज्यामध्ये शासनस्तरावरून कोणतीही कारवाई
झालेली नाही. १० जानेवारी रोजी अन्न व
नागरी पुरवठा मंत्रींनी राज्यस्तरीय संघटनेच्या
पदाधिकार्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक आयोजित
केली होती. याबैठकीवेळी राज्यातील स्वस्त धान्य
दुकानदारांच्या मागण्या तसेच मार्जिन मध्ये ५०
रुपये इतकी वाढ करण्याबाबत सकारात्मक चर्चा
झाली होती. परंतु आज पर्यंत या विषयावर कोणताही निर्णय झाला नसून या विषयावर चर्चा करण्या करीता राज्यातील सर्व स्वस्तधान्य दुकानदारांच्या प्रश्नावर आणि प्रलंबित मागण्यांवर राज्य शासानाचे लक्ष्य वेधण्या करीता विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये
त्रिस्तरीय आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचाच
एक भाग म्हणून अमळनेर तहसील कार्यालया
समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. सदर निवेदनावर तालुकाध्यक्ष प्रवीण
गोसावी, शहराध्यक्ष दिलीप आर. सैनानी, जिल्हा
कार्याध्यक्ष महेंद्र एस. बोरसे, अशोक पाटील,
शशिकांत पाटील, विजय पाटील, सुरेश चौधरी,
प्रकाश मराठे, प्रफुल्ल जैन, सुनिल वाणी, मुन्ना
वाणी, गौरव महाजन, गौतम जैन, अशोक अग्रवाल, महेंद्र कोळी, प्रमोद वाणी, अशोक डागा, वाल्मिक
पाटील, राहुल पाटील, आदींच्या सह्या आहेत.
राज्यातील रास्तभाव दुकानदारांच्या मार्जीनमध्ये
आजच्या महागाई निर्देशकानुसार किमान १००
रुपये प्रती क्विंटल इतकी वाढ करण्यात यावी.
शासकीय धान्य गोदामातून येणाऱ्या धान्याच्या
गोणी वजनात ५० किलो पेक्षा कमी भरत
असल्यामुळे प्रत्यक्ष दुकानामध्ये गोणीचे वजन
करून देण्यात यावे. तसेच देण्यात येणारे धान्य हे
स्वच्छ व मनुष्यास खाण्यासाठी योग्य असावे.
अस्वच्छ व खराब धान्याचा पुरवठा करण्यात येवू
नये. रेशन कार्ड मधील प्रत्येक लाभार्थ्याची आधार
क्रमांकांसह पडताळणी अर्थात (ईकेवायसी) ही
निरंतर प्रक्रिया असायला हवी, त्यासाठी वेळेचे
बंधन नसावे.