बोरगाव वि का सोसायटीच्या रेशन दुकानात ई-केवायसी चे काम चालू
शिरपूर प्रतिनिधी : राज्य सरकारच्या नवीन धोरणनुसार रेशन कार्डाद्वारे मोफत धान्याचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना ३० जूनपर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे.
अन्न पुरवठा विभागाला मोफत धान्य वितरण संदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे सरकारने नवीन धोरण आखले आहे. धुळे जिल्ह्यातील कार्डधारकांना सर्वच रेशन दुकानांमध्ये जाऊन केवायसी करायची आहे. केवायसी न करणाऱ्यांचे नाव खाद्य सुरक्षा यादीतून वगळण्यात येणार आहे.
ई-केवायसी करिता कार्डावर नमूद ग्राहकांना आपले आधार कार्ड दाखवून स्वस्त धान्य दुकानदाराला बायोमेट्रिक मशीनवर अंगठा देऊन केवायसी करायची आहे. याद्वारे कार्डावरील संबंधित व्यक्तीचा मेसेज शिधावाटप निरीक्षकाच्या लॉगइनवर येईल आणि तो त्यांच्यातर्फे अप्रूव्हल केला जाईल.
बोरगांव येथील काही रेशन कार्डधारकांचे बायोमेट्रिक मशिन वर थंब लागले नाहीत त्यांना आधार केंद्रात जाऊन आपले आधार कार्ड अपडेट करण्याचा सल्ला बोरगांव वि का सोसायटीचे चेअरमन योगेंद्रसिंग सिसोदिया यांनी दिला आहे. आपले आधार अपडेट झाल्यानंतरच ई-केवायसी होईल. अशा सूचना त्यांनी ग्रामस्थांना दिल्या आहेत.
रेशन दुकानात मोफत धान्य घेणाऱ्यांची गर्दी पाहता तहसील प्रशासनाने रेशन ई-केवायसी ची मुदत वाढवावी अशी चर्चा बोरगावात चालू आहे.
रेशन लाभार्थींचे ई केवायसी केल्यामुळे मृतकांची व लग्न झालेल्या मुलींची नावे वगळले जातील. सद्यस्थितीत जिल्ह्यात अनेकांच्या रेशनकार्डावर मृतकांच्या नावाची नोंद आहे. तसेच मुलींची लग्ने झाली आहेत, मात्र नाव रेशनकार्डवर आहेच त्यामुळे लाभार्थी त्यांच्या नावावर मोफत धान्य उचलत आहेत. मात्र आता ई-केवायसी प्रक्रियेमुळे मोफत धान्यासाठी किती लोक पात्र आहेत, याची खरी आकडेवारी पुढे येईल. अपात्र लोकांचे नाव कार्डावरून काढून टाकण्यात येईल. याद्वारे मोफत धान्य घोटाळ्यावर नक्कीच नियंत्रण येणार असल्याचे स्पष्ट होणार आहे.
बोरगांव गावाचे स्वस्त धान्य दुकान हे विविध कार्यकारी सोसायटीच्या नावावर आहे म्हणून वि का सोसायटीचे चेअरमन योगेंद्रसिंग सिसोदिया हे स्वतः ई-केवायसी साठी लक्ष घालून आहेत. ग्रामपंचायत कार्यालयात आतापर्यत 90% कार्डधारकांचे ई-केवायसी पूर्ण झाल्याचे गावाचे सरपंच व विकासो चेअरमन योगेंद्रसिंग सिसोदिया यांनी सांगितले.