कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व प्रताप महाविद्यालय धनदाई महाविद्यालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक मुक्त वारी, स्वच्छ वारी अभियान राबविण्यात आले.
अमळनेर : विक्की जाधव.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व प्रताप महाविद्यालय धनदाई महाविद्यालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत प्लास्टिक थर्माकोल ‘कचरा मुक्त’ “दिंडी” ‘हरित वारी- निर्मळ वारी स्वच्छ वारी -स्वस्थ वारी’ अभियान राबविण्यात आले. श्री संत सद्गुरु सखाराम महाराज संस्थान अमळनेर येथून श्री क्षेत्र अंमळनेर ते श्री क्षेत्र पंढरपूर आषाढी वारीस दिनांक 23 जून रोजी सुरुवात झाली याप्रसंगी सामाजिक उत्तरदायित्व म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला व परिसरातील कचरा, प्लास्टिक जमा करून प्लास्टिक मुक्त वारीचा संदेश दिला. वारीत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी एक अभूतपूर्व आनंद मिळतो व समाजाची सेवा करण्याची प्रेरणा मिळते व साधुसंतांचे दर्शन झाले असे मत वेक्त केले. याप्रसंगी सर्वांना सद्गुरु श्री संत सखाराम महाराज यांनी आशीर्वाद देवून कौतुक केले. याप्रसंगी बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव चे कुलसचिव प्रा. विनोद पाटील , राष्ट्रीय सेवा योजना संचालक प्राध्यापक डॉ. सचिन नांद्रे, अधिसभा सदस्य डॉ. संदीप नेरकर, प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए बी जैन, रासेयो जिल्हा समन्वयक प्रा डॉ. दिनेश पाटील, विभागीय समन्वयक प्रा. डॉ. दिलीप गिऱ्हे, प्रा. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा डॉ . हेमंत पवार, प्रा. डॉ. लीलाधर पाटील प्रा. रोशनी पाटील तसेच ५० स्वयंसेवक उपस्थित होते.