जळगाव लोकसभा मतदारसंघात चूरशीच्या लढाईत अखेर अखेर स्मिता ताई यांनी मारली बाजी.. 2 लाख 57 हजार मतांचा लीड घेत स्मिता ताई यांनी आपला गड राखला.
अमळनेर : विक्की जाधव.
भाजप महायुतीच्या उमेदवार स्मिताताई उदय वाघ यांच्या विजय झाल्याने संपूर्ण जिल्ह्यासह अमळनेर तालुक्यात कार्यकर्ते आणि जाण-सामान्यांना मध्ये मोठी आनंदाचे वातावरण झाले होते तर काही ठिकाणी गुलाल उधळत फाटक्याची अतिशबाजी ही झाली. तर महाविकास आघाडी तथा उबाठाचे उमेदवार करण पवार मात्र पराभूत झाले आहेत. स्मिता वाघ याना 7 लाख 4 हजार 197 तर करण
पवार यांना 4 लाख 46 हजार 339 मते मिळाली आहेत. काल झालेल्या जळगाव येथील एमआयडीसी येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडून
दुपारीचं स्मिता वाघ यांना विजयी घोषित करण्यात आले.
महायुती व महाविकास आघाडी दोघांकडूनही विजयाचा दावा होत असल्याने संभ्रम निर्माण झाला होता. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर गेल्याकाही दिवसात अनेकांनी वेगवेगळे तर्कवितर्क लावून आपले अंदाज बांधले होते कोण जिंकणार याबाबत चर्चानां उधाण आले होते. कोणत्या तालुक्यात कुणाला लिड मिळाला याचीच चर्चा सर्वत्र होती. असे असताना स्मिता ताई उदय वाघ यानीं बाजी मारल्याने सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात आला.