अमळनेर पालखी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा, हजारो भाविकांनी घेतले पालखीचे दर्शन..
अमळनेर : विक्की जाधव.
संत सखाराम महाराजांच्या अमळनेर यात्रोत्सवतील मोहिनी एकदाशीला रथ आणि पौर्णिमेच्या दिवशी पालखी मिरवणूक अक्षय तृतीया म्हणजेच आखाजी पासून सुरू झालेल्या या उत्सवाला पौर्णिमेच्या पालखी मिरवणुकीने झाली सागतां.
संपूर्ण महाराष्ट्रातून पालखी मिरवणुकीसाठी भाविक हजेरी लावत असतात. सकाळी ६ वाजेला विधिवत पूजा करून वाडी संस्थान मधून पालखी मिरवणुकीला शुभारंभ होता असतो. पालखीत सजावट केलेली हातात ढाल तलवार घेतलेली श्री. मूर्ती, त्या पाठोपाठ असणाऱ्या रथात संत सखाराम महाराज यांच्या पादुका ठेवण्यात आल्या होत्या.याशिवाय हनुमान गरुड यांचे वाहन हीं असते. पालखीच्या पुढे,प्रतापकुमार व्यायाम शाळाचे लेझीम पथक तसेच पवनपुत्र व्यायामशाळा व मंडळाचे ढोल पथक, भुसावळ येथील रेल्वे बँड पथक आणि पिंपळे रोडवरील ढोल पथक, तर सायंकाळनंतर चाळीसगाव येथील सद्गुरू बँड पथक यांचे आकर्षण होते. त्या पाठोपाठ मेणा,निशाणाचे घोडेस्वार, भालदार चोपदार त्या पाठोपाठ पालखी आणि पालखीच्या मागे हभप प्रसाद महाराज अनवाणी चालत होते. सकाळपासून महिला, पुरुष, वृद्ध बालकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती. रस्त्यात परंपरेप्रमाणे महाराज ठरल्या ठिकाणी असंख्य भाविकांच्या घरी पान सुपारीला थांबले होते, पालखी रात्री बरोबर दहा वाजता म्हणजे तब्बल 15 तास वाजत गाजत नदीपात्रात येऊन समाधी मंदिरासमोर भजन होऊन कार्यक्रमाचे ( उत्सवा ची )सांगता झाली.