खरे सांगा ताई कोणत्या आश्वासनाने मते मागणार??
आपण जि. प. सदस्या होत्या.. जि. प अध्यक्ष होत्या, नव्हे नव्हे आमदार ही होत्या… पण खरे सांगा ताई आपण फक्त सत्ताचं भोगली का?
का राजकारण केले.? २०१९ विधान सभेचे भाजपा चे आमदार असलेले मा शिरीष दादा चौधरी यांच्या विरोधात ही आपण प्रचार केला?? तेव्हा कुठे होती पक्ष निष्ठा आणि एकनिष्ठता. शेवटी शिरीष दादा भाजपा कडूनच लढत होते ना.. एकनिष्ठ एकनिष्ठ मिरवणाऱ्या पक्षाला एक ठाऊक नाही का??
आता होऊ घातलेल्या निवडणूक प्रचारात तुमच्या सोबत फिरणारे कार्यकर्ते मध्ये ही दोन मतांतर आहेत.
कुजबूज करणारे पक्षाचे असंख्य कार्यकर्ते स्मिता ताईंच्या विरोधात…
ऐका कार्यकर्त्यास स्मिता ताई यांनीच केला होता पद देण्यासाठी विरोध.. कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत आता वेळ आली आहे.
तालुक्यातील पक्षाचे जेष्ठ सल्लागार मार्गदर्शकाय सोबत आहेत पण काम करणार का?
गटबाजीच्या राजकारणात असंख्य नाराज कार्यकर्ते कोणाच्या नाही तर कोणाच्या संपर्कात आहेतच. अशी बरीच नावे आहेत..
अन अमळनेर भाजपाची जुनी फळी काम करण्यास तयार नाही. मोदी फॅक्टर काम करणार नाही. शेतकरी वर्गात प्रचंड नाराजगी दिसून येत आहे.
दिवसेंदिवस वाढणारी महागाई गॅस सिलेंडरचे वाढणारे भाव या मोदीच्या गॅरंटीने जळगांव जिल्ह्यात भाजपाच्या खासदारांना संधी?? नको गं बाई.
स्वतःच्या गावाला, जानवे-डांगर मतदार संघात वर्षोनू वर्षे भीषण पाणी टंचाई, असते अमळनेर तालुक्यातील सर्वाधिक गावे आजही तहानली आहेत.. बऱ्याचश्या ग्रामीण भागात आजही टँकर सुरू आहेत. आणि आता ताई निघाल्या लोकसभा मतदार संघाला पाणी टंचाई मुक्त करायला!!
ज्या मतदारसंघात आपण वर्षानुवर्ष राजकीय पोळी भाजत आल्या.. त्या परंपरागत मतदार संघात आपण पाणी पुरवठा सुरळीत करू शकल्या नाहीत तर इतक्या मोठ्या जळगाव लोकसभा मतदार संघास कसे पाणी पाजणार..?
भाग २ वृत्त लवकरच.