खान्देश भुमीचाच शिक्षक आमदार पाहिजे – संदिप घोरपडे …
बोराडी ता.शिरपूर (वार्ताहर) बोराडी येथील किसान विद्या.प्रसारक संस्थेचे शैक्षणिक शिबिर ऐकले होते,आज त्याचा प्रत्यक्ष अनुभव आला.थोर शिक्षणमहर्षी कर्मवीर अण्णासाहेब व्यंकटराव रणधीर यांच्या आठवणींसाठी तुम्ही हा कार्यक्रम करतात आणि त्या कार्यक्रमास उपस्थितीसाठी करण्यासाठी आमची पण इच्छा होती.अण्णासाहेब आमचे वडील मा.आमदार गुलाबराव पाटील यांचे आदर्श होते.काल आमची टीडीएफची बैठक झाली.यावेळेस नाशिक विभाग शिक्षक आमदार निवडणूकीचे उमेदवार व अण्णासाहेबांचे नातु निशांत रंधे यांची भेट झाली.या निवडणूकीत आम्ही निशांत रंधे यांच्या पाठीशी आहोत,कारण शिक्षकांचा आमदार शिक्षकच व खान्देशातील असायला हवा असे प्रतिपादन अमळनेर येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष
संदिप घोरपडे यांनी केले.
किसान विद्या.प्रसारक संस्थेचे मा.अध्यक्ष कर्मवीर अण्णासाहेब व्यंकटराव रणधीर यांच्या जयंतीनिमित्त बोराडीत संस्थास्तरावर अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.यावेळेस किसान विद्या.प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डाॅ.तुषार रंधे,अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष हेमकांत पाटील,सचिव संदिप घोरपडे,किसान विद्या.प्रसारक संस्थेचे सचिव निशांत रंधे,खजिनदार आशाताई रंधे,धुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक सिमाताई रंधे,आत्मनिर्भर अभियान संगठनचे जिल्हाध्यक्ष राहुल रंधे,
विनायक देवरे,मा.प्राचार्य बी.डी.पाटील,संस्थेचे विश्वस्त रोहित रंधे,धुळे-नंदुरबार ग.स बॅकेचे संचालक शशांक रंधे,विश्वस्त शामकांत पाटील इ.उपस्थित होते.
या प्रसंगी डाॅ.तुषार रंधे यांनी सांगितले की,शिक्षकांचे प्रश्न विधान परिषदेत मांडण्यासाठी आमदार म्हणून शिक्षकच असायला हवा,तरच त्यांना शिक्षकांच्या प्रश्नांची जाणीव व तळमळ राहील.व खंबीरपणे बाजू मांडू शकेल.
टीडीएफचे राज्यकार्यकारिणी सदस्य निशांत रंधे यांनी सांगितले की,कर्मवीर अण्णासाहेब व्यंकटराव रणधीर हे सुद्धा टी.डी.एफच्या पाठीशी होते. व मी देखील आधीपासूनच सामान्य कार्यकर्ता म्हणून टी.डी.एफशी एकनिष्ठ आहे.संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांच्या विविध समस्यांसंदर्भात सक्रिय सहभाग घेतला असुन विधान परिषदेत शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी उमेदवारी करत असून,पाचही जिल्ह्यातील अनेक संस्थाचालक,शिक्षकांच्या भेटी घेतल्या असुन सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले.
यावेळेस व्यवस्थापक ए.ए.पाटील,के.डी.बच्छाव, भैय्या माळी,सिताराम माळी,प्राचार्य विकास पाटील,महेश पवार,उपप्राचार्य कल्पेश वाघ, संस्थेच्या विविध शाखांमधील शाखाप्रमुख,शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.सुत्रसंचालन संदिप चौधरी यांनी केले.